इंदापूर : विकास कामांमध्ये पोलिसी बळाचा वापर करून राज्यमंत्र्यांनी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्ही अशा दडपशाहीचे राजकारण चालू देणार नाही. अशा शब्दात जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील ठाकरे यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर निशाणा साधला.
ओबीसी विधेयकावर राज्यपालांनी सही नाकारली; राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल संघर्ष टोकाला
अंकिता पाटील ठाकरे म्हणाल्या की,’ जिल्हा परिषद सदस्या भारती मोहन दुधाळ यांनी वेळोवेळी त्यांच्या मतदारसंघातील विकास कामासाठी तसेच कौठळी येथील तीन वर्ग खोल्यांच्या मंजुरीसाठी जिल्हा परिषदेशी सातत्याने पत्रव्यवहार केला. तसेच 22 लाख 50 हजाराचा निधी तीन वर्ग खोल्यासाठी मंजूर करून घेतला होता. त्याच्याच भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असताना राज्यमंत्र्यांनी आपल्या बळाचा वापर करीत पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या विकास कामाच्या उद्घाटनावेळी अडथळा आणल्याचा आरोप अंकिता पाटलांनी केल आहे.
शिवसेनेच्या एकेकाला ठोकून काढा; खासदार पूनम महाजन
यानंतर अंकिता पाटील ठाकरे यांच्या हस्ते सदर कामाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे सदस्य व माजी उपसभापती देवराज भाऊ जाधव, माजी सरपंच प्रकाश काळेल, भारतीय जनता पार्टी विस्तारक राजकुमार जठार व कौठळी गावातील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
Read also:
- राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा भाजप प्रवेश थांबवा आणि मग स्वप्न बघा; मुळीक यांचे जगतापांना खुले आव्हान
- २०२२चा अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांची घोर निराशा करणारा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- भारताला आत्मनिर्भर अन् बलशाली बनविणारा अर्थसंकल्प – आमदार महेश लांडगे
- औरंगाबादेत ज्या दुकानात वाईन विक्री सुरु होईल ते दुकान मी फोडणार; इम्तियाज जलीलांचा इशारा
- राष्ट्रवादीचे नगरसेवक घाबरल्याने सोयीस्कर प्रभाग रचना? औंध, बाणेर, बालेवाडीतील सर्वपक्षीय इच्छुकांचा संताप