मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२२ वर्षाचे आर्थिक बजेट सादर केले. बजेटमध्ये मोठ्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. ५g नेटवर्क असेल, वंदे मातरम ट्रेन असेल आणि इतरही काही महत्वपूर्ण योजना निर्मला सीतारामन यांनी काल बजेट सादर करताना घोषित केल्या. केंद्राने सादर केलेल्या बजेटवर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी मात्र टीकेची झोड उठवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना जोरदार टीका केली आहे.
नितेश राणेंना मोठा धक्का; स्वीय सहाय्यकाला ४ दिवसांची कोठडी, राणेंना जेल की बेल ?
कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुले सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्रासमोर मोठी आव्हाने उभे राहिल्याचे सांगत हा अर्थसंकल्प नोकरदारांसह सर्वसामान्यांच्या अपेक्षांचा भंग करतो, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे. देशातील वाढती बेरोजगारी आणि सातत्याने कमी होत चाललेले उत्पन्नाचे स्रोत यामुळे सर्वसामान्यांच्या मनात प्रचंड अस्वस्थता आहे.
60 लाख नव्या नोकऱ्या, 400 वंदे भारत ट्रेन, ‘सेझ’चा कायदा बदलणार, शेती व्यवसयासाठी बजेटमध्ये काय?
कोरोनाच्या महामारीनंतर सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्रासमोर मोठी आव्हाने उभे राहिली आहेत. लोकांची क्रयशक्ती कमी होत असताना खासगी क्षेत्रातील गुंतवणूकही कमालीची कमी झालेली दिसत आहे . अशा परिस्थितीत केंद्रीय अर्थसंकल्पात ठोस उत्तरे मिळतील अशी अपेक्षा होती. परंतु, जनसामान्यांमध्ये असणारी अस्वस्थता केंद्र सरकारपर्यंत पोहोचलेली दिसत नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प नोकरदारांसह सर्वसामान्यांच्या अपेक्षांचा भंग करतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
Read also:
- भारताला आत्मनिर्भर अन् बलशाली बनविणारा अर्थसंकल्प – आमदार महेश लांडगे
- औरंगाबादेत ज्या दुकानात वाईन विक्री सुरु होईल ते दुकान मी फोडणार; इम्तियाज जलीलांचा इशारा
- राष्ट्रवादीचे नगरसेवक घाबरल्याने सोयीस्कर प्रभाग रचना? औंध, बाणेर, बालेवाडीतील सर्वपक्षीय इच्छुकांचा संताप
- शिवसेनेच्या एकेकाला ठोकून काढा; खासदार पूनम महाजन
- ओबीसी विधेयकावर राज्यपालांनी सही नाकारली; राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल संघर्ष टोकाला