मुंबई : एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि अप्लसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यातील संघर्ष मागील काळात संपूर्ण महाराष्ट्रात गाजला होता. आता एनसीबीचे समीर वानखेडे यांची दुसरीकडे बदली करण्यात आली आहे.
मात्र अद्यापही महाविकास आघाडी सरकार आणि समीर वानखेडे यांच्यातील संघर्ष संपलेला दिसत नाही असंच काहीसं चित्र समोर आलं आहे. समीर वानखेडे यांनी मुंबईत एक बार सुरु केला होता. समीर वानखेडे यांनी त्यांचे वय १७ वर्ष असताना या बारचा परवाना घेतला होता. या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाच्या अहवालानुसार ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नॉर्वेकर यांनी वानखेडेंचा बारचा परवाना रद्द केला आहे.
औरंगाबादेत ज्या दुकानात वाईन विक्री सुरु होईल ते दुकान मी फोडणार; इम्तियाज जलीलांचा इशारा
समीर वानखेडे यांनी पात्र नसतानाही बारचा परवाना घेतल्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समोर आणले होते. ते म्हणाले होते की, कमी वयाच्या मुलाच्या नावाने परवाना घेण्यात आला. १८ वर्षाच्या खालील लोकांना परवाना दिला जात नाही आणि कोणताही शासकीय अधिकारी शासन नोकरी करत असताना व्यवसाय करू शकत नाही. हा नियमभंग आहे. आता तरी त्यांच्यावर कारवाई करावी आणि जर त्यांना अजून वाचवलं तर केंद्र आणि भाजप त्यांना वाचवत आहे, असा त्याचा अर्थ होईल.
भारताला आत्मनिर्भर अन् बलशाली बनविणारा अर्थसंकल्प – आमदार महेश लांडगे
बारचा परवाना घेत्यावेळी वानखेडे यांचे वय १७ वर्षे १० महिने होते. हा परवाना २०२२ पर्यंत वानखेडे यांच्या नावावर आहे. बारचा परवाना मिळवण्यासाठी २१ वर्ष इतकी वयाची अट आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने काही दिवसंपूर्वी ठाण्याचे जिल्हाधिकारी आणि उत्पादन शुल्क अधीक्षक यांच्याकडे हे नेमके कसे घडले याविषयी विचारणा केली होती. उत्पादन शुल्क विभागाची प्राथमिक चौकशी संपल्यानंतर या प्रकरणी ठाण्याचे जिल्हाधिकारी आणि ठाण्याचे उत्पादन शुल्क अधीक्षक यांना कारवाईचे निर्देश देण्यात आले होते.
Read also:
- गॉडफादरच्या रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्यांना घरी पाठवा; रोहन खंवटे यांचे आवाहन
- नितेश राणेंच्या पाठोपाठ आता निलेश राणेंवरही गुन्हा दाखल; राणेंच्या दोन्ही पुत्रांभोवती पोलिस कारवाईचा फास
- इंदापूर तालुक्यात दडपशाहीचं राजकारण खपवून घेणार नाही; अंकिता पाटलांचा दत्तात्रय भरणेंना इशारा
- राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा भाजप प्रवेश थांबवा आणि मग स्वप्न बघा; मुळीक यांचे जगतापांना खुले आव्हान
- २०२२चा अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांची घोर निराशा करणारा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे