नागपूर : काॅंग्रेस पक्षाचा आज स्थापना दिवस असून नागपुरात यानिमित्ताने जंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जवळपास ४० एकरवर काॅंग्रेसची सभा होणार असून या सभेसाठी देशातील महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमासाठी काॅंग्रेसने है तयार हम अशी थिम ठेवली आहे. राहुल गांधींसह अनेक नेत्यांचे नागपूरात पोस्टर लावण्यात आले आहे. तर या अभियानावरून आता भाजपने काही सवाल केले आहेत.
हेही वाचा…“मी परत खासदार झालं पाहिजे अशी लोकांची इच्छा”, लोकसभा लढण्याची खैरेंनी व्यक्त केली पुन्हा इच्छा
काँग्रेसचं है तयार हम अभियान नेमकं कशासाठी? असं म्हणत भाजपने काॅंग्रेसला पाच सवाल विचारले आहेत. यामध्ये १) हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनला साथ देण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का? २) स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का? ३) काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याकडे सापडलेली साडे तीनशे कोटींची रोकड अवैध मार्गानं कशी मिळवावी हे सांगण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का? ४) मोहब्बत की दुकानच्या नावानं द्वेष पसरविण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का? ५) घराणेशाही कशी वाचवायची हे सांगण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का? असाही सवाल त्यांनी केलाय. त्यावर आता काॅंग्रेसकडून काय प्रत्युत्तर देण्यात येईल? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…अजित पवारांची तक्रार चंद्रकांत पाटलांकडे; जिल्हा नियोजन समितीत मोठा वाद
दरम्यान, भारत जोडो यात्रेच्या अभूतपुर्व यशानंतर काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत न्याय यात्रा १४ जानेवारीपासून सुरू होत आहे. मणिपूर मधल्या इंफाळ मधून राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेला सुरूवात होऊन तब्बल ६२०० किलोमीटर अतंर पार करत २० मार्चला मुंबईत समारोप होणार आहे. यावेळी ही यात्रा बस आणि पायी अशा दोन्ही स्वरूपाची असणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“देशात कुणी अशी धडक मारली नसेल तशी मुंबईत धडक मारा”, जरांगे पाटलांनी मुंबईत जाण्याचा सांगितला मार्ग
हेही वाचा.महायुतीतून कधी बाहेर पडणार ? बच्चू कडूंनी थेट स्पष्टच सांगितलं
हेही वाचा“वय अन् वास्तव माहिती नसल्यामुळे ‘त्या’ अजितदादावर आरोप करताहेत”, शालिनीताई पाटलांना अजित पवार गटाचं प्रत्युत्तर
हेही वाचालोकसभा निवडणुकीसाठी वंचितसोबत युती करणार की नाही ? शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले..
हेही वाचा…“डॉ. पंजाबराव देशमुखांना भारतरत्न पुरस्कार मिळावा,” देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली इच्छा