राष्ट्रवादीने आधी आपलं घर सांभाळावं आणि नंतर भाजपवर बोलावं , अशी जोरदार टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी ‘मिशन घरवापसी’च्या मुद्यावर भाजपने पलटवार केला आहे .
‘राष्ट्रवादी काँग्रेस स्वत:च्या घरातला भेद आणि विसंवाद लपवण्यासाठी भाजपचे आमदार राष्ट्रवादीत परत येणार अशा अफवा पसरवण्याचं काम राष्ट्रवादीकडून अतिशय योजनाबद्ध पद्धतीने सुरु आहे. या प्रयत्नाला कोणतंही यश मिळण्याची शक्यता दुरान्वयेही नाही. ; , असे शेलार म्हणाले.
शरद पवार, जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात काल (बुधवारी) एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत नेत्यांच्या घरवापसीबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यावर बोलताना शेलार म्हणाले, ‘
जयंत पाटील आणि अजित पवार यांनी स्वत:च्या पक्षात जरी संवाद साधला तरी खूप आहे असा यांचा खोचक टोलाही शेलार यांनी लगावला. आधी स्वत:चं सरकार आणि स्वत:चा पक्ष वाचवा असंही ते म्हणाले. भाजपला ना कोणाचा परिवार फोडण्याची इच्छा नाही ना सरकार पाडापाडीत रस आहे असेही त्यांनी स्पष्ट केले