मुंबई : तौक्ते चक्रीवादळाचा सर्वात जास्त तडाखा कोकण किनारपट्टीला बसला असून, फळबागांसह, अनेक घरांचे आणि मच्छीमारांच्या बोटींचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर या पट्ट्यातील रायगड जिल्ह्याला आज राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी, “मागच्या वर्षी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाची भरपाई अजूनही इथल्या नागरिकांना मिळाली नाही, यानंतर आता वर्षभरातच नागरिकांना दुसरा फटका बसला आहे. त्यामुळे सरकारने तातडीने त्यांना भरघोस नुकसान भरपाई द्यायला हवी”, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच आज त्यांनी, रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून वादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. “रायगडमध्ये झालेल्या नुकसानीचा आम्ही आढावा घेतला आहे. याठिकाणी जवळपास ८ ते १० हजार घरांचं नुकसान झालेलं आहे. तसेच, ५ हजार हेक्टरमधल्या फळपिकांचं यामध्ये नुकसान झालं असून, उन्हाळी तांदूळ आणि इतर फळपिकांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे,” असं त्यांनी सांगितलं.
‘महामारीमुळे आणि लॉकडाऊन असल्याने कित्येक महिन्यांपासून व्यवसाय ठप्प आहेत. त्यातच दुसरीकडे इथल्या नागरिकांना वर्षभरातच दुसरा झटका बसला आहे. पाहणीमध्ये काही जिल्ह्यांनाच वादळाचा जोरदार फटका बसला असल्याचं दिसून आलं आहे. सरकारवर याचा फारसा बोजा देखील पडणार नाहीये. त्यामुळे आमची अपेक्षा आहे की सरकारने भरघोस मदत करायला हवी”, अशी अपेक्षा त्यांनी सरकारकडून ठेवली आहे .
दरम्यान, इथे २०० शाळा, २५ वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या इमारती यांचं देखील नुकसान झालं असून, अद्यापही १७२ गावांमधल्या ७० हजार घरांचा वीजपुरवठा, विजेचे खांब उन्मळून पडल्याने पूर्ववत झालेला नाहीये. वादळामुळे बोटींचं नुकसान देखील मोठ्या प्रमाणावर झालं आहे.
Read Also :
- ‘शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्या अन्यथा…’, काँग्रेसचा मोदी सरकारला इशारा
- ‘ठाकरे सरकार पाण्यात डुंबत बसलेल्या म्हशीसारखं, ढुसणी दिल्याशिवाय हलत नाही’
- “पोटात आहे तेच ओठात येतं”, मोदीजी म्हणाले करोना केसेस वाढवा!
- केंद्राकडून लस निर्मिती वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची मला कल्पना नव्हती.
- “माझे पती मंत्री आहेत, त्यांच्याकडे एवढी संपत्ती असताना त्यांना आमदार निवासाची गरज काय?” करूणा धनंजय मुंडे