मुंबई : महामारीच्या व्यवस्थापन आणि नियोजनावरून आधीच केंद्र सरकार टीकेचे धनी झालेले असताना, आता केंद्र सरकारवर रासायनिक आणि मिश्र खतांच्या दर वाढीच्या निर्णयावरून हल्लबोल केला जात आहे.
अनेक नेत्यांनी यासंदर्भात आपली भूमिका थेट संबंधित खात्याच्या मंत्र्यांपर्यंत पोहोचवली असून, काही नेत्यांनी थेट पंतप्रधान मोदींना देखील यावरून पत्र लिहून ही दरवाढ त्वरित थांबवण्याची मागणी केली आहे. यात भाजपच्या राज्यातील काही नेत्यांचा देखील समावेश आहे.
दरम्यान, यावरूनच आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान मोदी यांना इशारा देत, “येत्या २ दिवसांत ही अन्यायकारक खत दरवाढ मागे घ्यावी, नाहीतर काँग्रेस राज्यभर घंटानाद आंदोलन करेल”, असा इशारा दिला आहे.
तसेच, “मोदी सरकारचे धोरण “शेतक-यांचे मरण” हेच असून, आधी बळजबरीने केलेले ३ काळे कायदे अंमलात आणल्यानंतर, आता रासायनिक आणि मिश्र खतांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेऊन, मोदी सरकार शेतक-यांना पूर्णपणे ध्वस्त करण्याचा कार्यक्रम वेगाने पूर्ण करत आहे”, अशी बोचरी टीका त्यांनी मोदी सरकारवर केली आहे.
“या निर्णयामुळे शेतक-यांना शेती करणे तर परवडणार नाहीच, पण त्यांना अखेर नाईलाजाने आपली शेती मोठ्या उद्योगपतींना कंत्राटीपद्धतीने देण्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि हीच सरकारची इच्छा आहे म्हणून ही दरवाढ केली गेली आहे. त्यामुळे येत्या २ दिवसात ही खत दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा काँग्रेस राज्यभर घंटानाद आंदोलन करेल” असा जोरदार हल्लबोल त्यांनी केला आहे.
Read Also :
- ‘ठाकरे सरकार पाण्यात डुंबत बसलेल्या म्हशीसारखं, ढुसणी दिल्याशिवाय हलत नाही’
- संजय राऊत म्हणजे, ‘सेक्रेड गेम्स’मध्ये “अहं ब्रह्मास्मि” म्हणणारे तिवारी’
- “पोटात आहे तेच ओठात येतं”, मोदीजी म्हणाले करोना केसेस वाढवा!
- केंद्राकडून लस निर्मिती वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची मला कल्पना नव्हती.
- “माझे पती मंत्री आहेत, त्यांच्याकडे एवढी संपत्ती असताना त्यांना आमदार निवासाची गरज काय?” करूणा धनंजय मुंडे