मुंबई : मराठा आरक्षण रद्द झाल्यापासून राज्यात मराठा समाजामधून राज्य सरकार विरोधात नाराजीचा सूर उमटत आहे. एकीकडं हे आरक्षण रद्द होण्याला कारणीभूत आघाडी सरकार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे, तर दुसरीकडे आधीच्या सरकारने या आरक्षणात आधीपासूनच काही त्रुटी ठेवल्या होत्या त्यामुळे प्रयत्न करून देखील हे आरक्षण आम्ही न्यायालयात टिकवू शकलो नाही, असा आरोप ठाकरे सरकारकडून भाजपवर केला जात आहे.
दरम्यान, या सगळ्या गोंधळात, मराठा समाजाने पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली असून, १ जून ते ५ जून दरम्यान मराठा समाज राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची वल्गना, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिली आहे. यातच त्यांनी आज पुन्हा ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला असून, “हे सरकार पाण्यात बसलेल्या म्हशीसारखं आहे. ढुसणी दिल्याशिवाय हलणार नाही”, असा जोरदार टोला मेटे यांनी आघाडी सरकारला लगावला आहे.
तसेच, “महाविकास आघाडी सरकार खोटारडे आहे. आम्ही जेव्हा सांगत होतो; की एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना नियुक्त्या द्या. तेव्हा ते विद्यार्थ्यांना थेट कोर्टात जा म्हणाले आणि आता जेव्हा आमचे आरक्षण रद्द झाले आहे तेव्हा सरकारला जाग आली आहे. याला पूर्णतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठा आरक्षण विषय उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण जबाबदार आहेत. या सरकारमुळे आरक्षण मिळालं नाही, एडब्ल्यूएसचंही आरक्षण लागू झालं नाही, ‘सारथी’च्या विद्यार्थ्यांना पीएचडी साठी एका दमडीची देखील फेलोशिप मिळाली नाही. हे सरकार त्यांना धड शिकूही देत नाहीत आणि शिकण्यासाठी न्यायही देत नाहीत, हे कसलं सरकार?”, असा संतप्त सवाल मेटे यांनी सरकारला विचारला आहे.
Read Also :
- संजय राऊत म्हणजे, ‘सेक्रेड गेम्स’मध्ये “अहं ब्रह्मास्मि” म्हणणारे तिवारी’
- “पोटात आहे तेच ओठात येतं”, मोदीजी म्हणाले करोना केसेस वाढवा!
- केंद्राकडून लस निर्मिती वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची मला कल्पना नव्हती.
- “माझे पती मंत्री आहेत, त्यांच्याकडे एवढी संपत्ती असताना त्यांना आमदार निवासाची गरज काय?” करूणा धनंजय मुंडे
- “पंतप्रधान मोदी साहेब, आशा आहे सकारात्मक पाऊल उचलले जाईल”; खत भाव वाढीवरून प्रीतम मुंडेंचे पत्र