मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत सातत्याने केंद्र सरकार आणि इतर अनेक विषयांवर रोज सकाळी येऊन माध्यमांसमोर टीका-टिपण्णी करत असतात. आज देखील त्यांनी पंतप्रधान मोदींच्या गुजरात दौऱ्यावर टीका करताना, “मान्य आहे गुजरात हे पंतप्रधान मोदी यांचे स्वत:चे राज्य आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमधील सरकार कमजोर आहे. कदाचित यामुळेच पंतप्रधानांनी केवळ गुजरातचा दौरा केला असावा. त्यांना याची जाणीव झाली असावी; की महाराष्ट्रात उद्धव ठाकरे कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम आहेत”, अशी खोचक टीका केली होती.
यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी निशाणा साधला असून, आज मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना, शिवसेना नेते संजय राऊत म्हणजे, ‘सेक्रेड गेम्स’ या सिरीजमधील तिवारीच्या पात्राप्रमाणे वावरतात. त्यांना ‘अहं ब्रह्मास्मि’चा असल्याचा भास होतो, ते सतत त्याच थाटात असतात”, असा टोला त्यांनी लगावला आहे.
तसेच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका केली असून, “पंतप्रधान नरेंद्र मोदी बऱ्याच काळ गुजरातचे मुख्यमंत्री होते. देशाचे पंतप्रधान असले तरी त्यांचे स्वत:च्या राज्यावरही प्रेम आहे. आणि इकडे आमचे मुख्यमंत्री मुंबईत राहूनही स्वतःच्या घराबाहेर पडत नाहीत”, असा शाब्दिक समाचार त्यांनी घेतला आहे.
Read Also :
- “पोटात आहे तेच ओठात येतं”, मोदीजी म्हणाले करोना केसेस वाढवा!
- केंद्राकडून लस निर्मिती वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची मला कल्पना नव्हती.
- “माझे पती मंत्री आहेत, त्यांच्याकडे एवढी संपत्ती असताना त्यांना आमदार निवासाची गरज काय?” करूणा धनंजय मुंडे
- “पंतप्रधान मोदी साहेब, आशा आहे सकारात्मक पाऊल उचलले जाईल”; खत भाव वाढीवरून प्रीतम मुंडेंचे पत्र
- मोठी बातमी! पदोन्नतीत आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारकडून तूर्त स्थगिती