मुंबई : महामारीच्या आकस्मिक संकटाने आधीच शेतकरी राजाचे कंबरडे मोडले असताना, आता रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या मुश्किलीत सापडला आहे. आधीच दुष्काळात तेरावा महिना म्हणायची वेळ आलेल्या शेतकऱ्याला, या दरवाढीच्या निर्णयामुळे मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने, बळीराजाला दिलासा देण्यासाठी रासायनिक आणि मिश्र खतांच्या किंमती कमी करण्याची मागणी भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी पंतप्रधानांना आणि केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहून केली आहे.
या संकटात देखील शेतकऱ्यांनी नागरिकांना तारले आहे. परंतु, यासाठी मोठा आर्थिक भार अन्नदात्या बळीराजावर आधीच पडला आहे. त्यात पुन्हा या खत दरवाढीचा अतिरिक्त आर्थिक भार पडू नये, यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने सातत्यने शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे खतांच्या किंमती कमी करण्यासंदर्भात देखील केंद्र सरकारकडून सकारात्मक पाऊल उचलले जाईल”, अशा विश्वास या पत्रात त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, राज्यातील अनेक नेत्यांनी केंद्र सरकारला तसेच, केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि सदानंद गौडा यांना या संदर्भातले पत्र लिहून तातडीने सरकारने रासायनिक आणि मिश्र खतांवरील दर वाढ कमी करावी अशी आग्रही मागणी केली आहे.
Reafd Also :
- मोठी बातमी! पदोन्नतीत आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारकडून तूर्त स्थगिती
- “खताच्या किंमती ह्या केंद्र सरकारने वाढवल्या नसून कंपन्यांनी वाढवल्या” सदाभाऊ खोत
- नितीन गडकरी भावी पंतप्रधान? काँग्रेसच्या बड्या नेत्याचे मोठे वक्तव्य
- ‘महाराष्ट्राला गुजरातसारखी वागणूक मोदींकडून का दिली जात नाही?’ मालिकांचा सवाल
- लसीकरणात महाराष्ट्र अव्वल, पार केला 2 कोटींचा टप्पा