मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकावर टीकेची तोफ डागली जात आहे. भाजप नेते आशिष शेलार यांना ठाकरे सरकारवर आरोप करत मराठा समाजाला एप्रिल फूल करण्याचा प्रयत्न करु नका, असे म्हटले आहे.
ज्यपालांना निवेदन देण्याआधी तज्ञांच्या समितीचे मत जाणून घेतले नाही. विरोधी पक्षाशी चर्चा केली नाही. विधानसभेत चर्चा झालेली नाही. मराठा समाजाच्या संघटनांशी चर्चा केली नाही. अशा प्रकारे कोणत्याही प्रकारची तयारी न करता राज्यपालांना निवेदन देऊन मराठा समाजाची फसवणूक राज्य सरकार करते आहे. मराठा समाजाला कृपया एप्रिल फुल्ल करु नका, असा इशारा आशिष शेलार यांनी दिला.
यावेळी बोलतान त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर देखील निशाणा साधला. ‘नाना पटोलेंच्या रुपाने महाराष्ट्रात एका पक्षाला विनोदी कलाकार अध्यक्ष लाभले आहेत. तै अनेक विनोद करीत असतात. त्यांच्या आजपर्यंत झालेल्या कोणत्याही पत्रकार परिषदेचे विषय मोदी, मोदी आणि मोदी आहेत. मग आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनियाजी गांधी यांच्या विषयी बोलले तर तुम्हाला राग का येतो? त्यामुळे नाना पटोले हे विनोदी कलावंत आहेत त्यांना गांभीर्याने घ्यायचे कारण नाही’, असा खोचक टोला शेलार यांन लगावला आहे.
महाविकास आघाडीमध्ये सगळं हास्यास्पद सुरु असल्याची टीका त्यांनी केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने दिलेले आरक्षण आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना फुलप्रुफ वाटत नाही मग, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारने केवळ एक समिती गठीत करुन दिलेले आरक्षण फुलप्रुफ वाटते का?, असा सवाल देखील त्यांनी केला.
Read Also :
- एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्या बदलीला ब्रेक, मॅटकडून स्थगिती
- ‘मराठा आरक्षणासाठी 2 दिवसीय विशेष अधिवेशन बोलवा’
- ‘राजेश टोपेंचे ‘ते’ विधान म्हणजे खोटारडेपणाचा कळस’
- 12 विरोधी पक्षांचे पंतप्रधान मोदींना पत्र, केल्या ‘या’ मागण्या
- ‘सुप्रीम कोर्टाने टास्कफोर्स स्थापन करून मोदींच्या अपयशावर शिक्कामोर्तब केले’