नवी दिल्ली : एकीकडे देशात कोरोना महामारीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प वरून विरोधकांकडून केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. लसीकरण मोहिमेत येत असलेल्या अडथळ्यावरून देखील आता विरोधी पक्षांनी केंद्राला सुनावले आहे. यासंदर्भात 12 विरोधी पक्षांनी थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहित मागण्या केल्या आहेत.
विरोधी पक्षांनी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे काम त्वरित थांबवावे, सर्वांना मोफत लसीकरण करावे, गरजूंना धान्य द्यावे, अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, जेडीएसचे नेते एचडी देवगौडा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, टीएमसीच्या नेत्या ममता बॅनर्जी, डीएमके नेते एमके स्टॅलिन, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव, राजद नेते तेजस्वी यादव, सीपीआय नेते डी. राजा आणि सीपीआयचे नेते सीताराम येचुरी या १२ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मोदींना पत्र लिहिले आहे.
विरोधी पक्षांनी केलेल्या मागण्या
- देशांतर्गत किंवा जगभरातून लसी शक्य तिथून लस खरेदी करावी.
- सगळ्यांना मोफत लसीकरणाचा कार्यक्रम ताबडतोब जाहीर करावा
- लस निर्मितीसाठी लायसन्सिंगची आवश्यकता रद्द करून, उत्पादन क्षमता वाढवावी
- अर्थसंकल्पातले 35 हजार कोटी लशींसाठी खर्च करावे.
- सेंट्रल विस्टा प्रोग्राम थांबवा. त्यासाठी करण्यात आलेली आर्थिक तरतूद व्हॅक्सिन आणि ऑक्सिजन खरेदीसाठी वापरा
- पीएम केअर फंड आणि सर्व खासगी फंडासाठी फंडातील सर्व जमा रक्कम बाहेर काढा आणि त्यातून ऑक्सिजन तसेच मेडिकल उपकरणे खरेदी करा
- बेरोजगारांना 6 हजार रुपये दरमहा भत्ता द्या.
- सर्व गरजूंना महिन्याला मोफत धान्य द्यावे.
- महामारीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शेतीकामाकडे लक्ष देता यावे म्हणून कृषी कायदा मागे घ्या.
Read Also :
- ‘सुप्रीम कोर्टाने टास्कफोर्स स्थापन करून मोदींच्या अपयशावर शिक्कामोर्तब केले’
- लॉकडाऊन वाढवला, लसीकरण स्थगित; ठाकरे सरकारचा निर्णय
- बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार वादग्रस्त वक्तव्याने पुन्हा चर्चेत, म्हणाले…
- काम झटकायचं आणि मंत्रिपद टिकवायचं, हेच आघाडी सरकारमधल्या मंत्र्यांचं काम
- रक्षा खडसेंचे शरद पवारांना पत्र, करून दिली जुन्या वादयाची आठवण