मुंबई : मराठा आरक्षणाचा चेंडू राज्य सरकारने केंद्राच्या मैदानात ढकलल्यानंतर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेटच्या वरिष्ठ मोजक्या नेत्यांसमवेत राज्यपालांना भेट दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रपतींना मराठा आरक्षणसंदर्भात लिहिलेले पत्र हस्तांतर केले. तसेच, “न्यायालयाच्या निकालानंतर मराठा समाजाच्या भावना लक्षात घेता, आम्ही केंद्राला विनंती करायचे ठरविले आणि त्यानुसार राज्यपालांना भेटून हे पत्र सुपूर्द केले आहे. या प्रश्नावर आम्ही लवकरच पंतप्रधानांची देखील भेट घेणार असून, त्यांनाही पत्र देणार असल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
दरम्यान, यावरून भाजपचे नेते आणि खासदार नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला असून, आघाडी सरकारकडून जबाबदारी झटकण्याचं काम सुरु आहे. या सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नव्हतं, अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे. तसेच, न्यायालयाने आरक्षण रद्दबादल केल्यानंतर राज्यपालांना निवदेन देण्याची राज्य सरकारला घाई का? असा सवालही त्यांनी केला आहे.
तसेच, “मंत्रिमंडळातल्या मराठा मंत्र्यांना या आरक्षणात काडीचाही रस नाही. त्यांना फक्त आपलं मंत्रिपद टिकवण्यात रस असल्याचा आरोपही नारायण राणेंनी केला आहे. या आघाडी सरकारच्या “ओठात एक आणि पोटात एक” आहे. मराठा समाजाला आरक्षण देणं हे या सरकारच्या गावी देखील नाही. त्यामुळे आता मराठा बांधवांनीच एक होण्याची गरज आहे,” असं आवाहन त्यांनी मराठा समाजाला केलं आहे.
Read Also :
- आदित्य ठाकरेंच्या पाठपुरावल्याला यश, एसआरपीएफ जवानांसाठी गृहमंत्र्यांचा दिलासादायक निर्णय
- रक्षा खडसेंचे शरद पवारांना पत्र, करून दिली जुन्या वादयाची आठवण
- मराठा समाजाला एप्रिल फूल करण्याचा प्रयत्न करु नका – भाजप नेते आशिष शेलार
- उद्धव ठाकरेंना बारामतीची हवा जास्तच मानवलेली दिसतेय; गोड बोलणे आणि पाठीत सुरी खुपसणे
- राष्ट्रवादीचे आमदार आण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार