पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालात मराठा आरक्षण रद्द करण्यात आले आहे. अजित पवार यांनी तीन महिन्यांपूर्वी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या पर्यायाविषयी सूतोवाच केले होते. परंतू आता अजित पवारांनी हा पर्याय पूर्णपणे बाजूला सारला आहे. एकप्रकारे अजित पवार मराठ्यांना पोकळ आश्वासने देवून घात करु नये, असे वक्तव्य संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी केले.
ते मंगळवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री महोदयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहल्याची बातमी आली. पुन्हा एकदा मराठा समाजाला मूर्ख बनवण्याचा कार्यक्रम सुरु झाला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
माननीय गायकवाड आयोग स्वीकारुन सरसकट ओबीसी समावेश जे पूर्णपणे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत आहे त्या विकल्पाकडे ठरवून दुर्लक्ष करून केंद्राकडे बोटं दाखवून हात झटकण्याचा घृणास्पद प्रकार मुख्यमंत्री करत आहेत. ज्या व्यक्तीने कधीही शब्द बदलला नाही अशा बाळासाहेबांचे ते वारस आहेत. परंतु सध्या बारामतीची हवा त्यांना जरा जास्तच मानवलेली दिसतेय. गोड बोलणे आणि पाठीत सुरी घोपासने, अशी घणाघाती टीका सौरभ खेडेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
Read Also :
- सामनामधून काँग्रेसला पुन्हा शालीतून जोडे, थेट वर्मावरच ठेवले बोट
- “केंद्रीय अर्थमंत्रालयाचे वित्त नियोजन एका वेगळ्याच दर्जाचे…”
- मराठा समाजाला एप्रिल फूल करण्याचा प्रयत्न करु नका – भाजप नेते आशिष शेलार
- भाजपच्या नेत्यांचा गोव्याला जाण्याचा प्रवासाचा खर्च रुपाली चाकणकर देणार
- नाना पटोले म्हणाले ‘सामना’ वाचत नाही, आता शिवसेनेने अग्रलेखातून दिले उत्तर…