मुंबई : एकीकडे देशात महामारीने जीवित आणि वित्त हानी झाली आहे. तसेच या हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाऊनचा पर्याय अवलंबला आहे. त्यामुळे आधीच महामारीने बेजार आणि त्रस्त झालेल्या नागरिकांचे आणखीनच कंबरडे मोडले आहे. त्यात आता देशभरात सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ होत असल्यामुळे, जनतेच्या मनातून केंद्र सरकारवर नाराजीचा सूर उमटत आहे.
दरम्यान, या शंभरी पार केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवरून, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंती पाटील यांनी, केंद्रावर आणि देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर ट्विट करून टीका केली आहे. “केंद्रीय अर्थ मंत्रालय एका वेगळ्याच दर्जाचे वित्त नियोजन करत आहे. निवडणुका आल्या की पेट्रोल डिझेलचे दर नियंत्रणात ठेवल्या जातात आणि निवडणुका गेल्या की दरवाढ ही ठरलेलीच! हे काय नियोजन आहे यावर अर्थमंत्र्यांनी प्रकाश टाकायला हवा! असे त्यांनी म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आलेख वर जात असून, आज दोन्हींच्या दरात प्रत्येकी २५-२५ पैश्याने वाढ झाली आहे. परिणामी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत ९२ तर डिझेलची किंमत ८६ रु. प्रति लिटर झाली आहे, दुसरीकडे मुंबई-पुण्यात देखील पेट्रोल-डिझेलच्या दरांनी अनुक्रमे ९८ रु. प्रति लिटर आणि ८८ रु. प्रति लिटरचा आकडा गाठलेला आहे.
केंद्रीय अर्थ मंत्रालय एका वेगळ्याच दर्जाचे वित्त नियोजन करत आहे. निवडणुका आल्या की पेट्रोल डिझेलचे दर नियंत्रणात ठेवल्या जातात आणि निवडणुका गेल्या की दरवाढ ही ठरलेलीच ! हे काय नियोजन आहे यावर @nsitharaman यांनी प्रकाश टाकायला हवा #PetrolDieselPriceHikehttps://t.co/xn9UI0N3IY
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 12, 2021
Read Also :
- नाना पटोले म्हणाले ‘सामना’ वाचत नाही, आता शिवसेनेने अग्रलेखातून दिले उत्तर…
- मराठा आरक्षणासाठी नवी रणनीती, आता मुख्यमंत्री गाठणार थेट दिल्ली
- “राम राज्य”चे गाजर दाखवणाऱ्यांनी, देशाला रामभरोसे सोडून दिले
- भाजपच्या नेत्यांचा गोव्याला जाण्याचा प्रवासाचा खर्च रुपाली चाकणकर देणार
- “नरेंद्र मोदी म्हणजे फकीर नाही तर, देशातील सर्वात मोठे ‘ऐशोआरामी शहेनशहा” अनिल गोटे