मुंबई : गेल्या काही दिवसांपासून, शिवसेनेचे मुख्यपत्र असलेल्या सामनामधून सातत्याने काँग्रेसवर शालीतून जोडे मारण्यात येत आहेत. तसेच, शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत हे देखील प्रसारमाध्यमांसमोर येऊन नकळत काँग्रेसवर निशाणा साधत आहेत.
दरम्यान, सामनाच्या अग्रलेखातून परत काँग्रेसवर भाष्य करण्यात आले असून, एकीकडे सोनिया गांधींचे कौतुक करताना, दुसरीकडे “आज काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्यासारखे नेतेच नाहीत, याला जबाबदार कोण, असा सवाल करत, थेट काँग्रेसच्या नेतृत्वावरच शंका उपस्थित करण्यात आली आहे. परंतु, लागलीच परत राहुल गांधी यांच्यावर स्तुतीसुमने देखील उधळी गेली असल्याने, “गोड बोलून शब्दांचा मार” अशा पद्धतीने काँग्रेसवर टीका केली जात असल्याचे दिसून येत आहे.
तसेच, नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी, संजय राऊत यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही, तसेच आम्ही सामना देखील वाचत नाही. राऊत हे नेहमीच इतरानावर टीका करत असतात, तसे केल्याने त्यांना पक्ष मोठा होतो असे वाटत असेल, पण कदाचित त्यांना याची जाणीव नसावी की, निव्वळ दुसऱ्यांवर टीका केल्याने पक्ष मोठा होत नाही,” असा हल्लबोल केला होता. त्याला देखील यातून प्रत्युत्तर दिले गेले आहे.
“महाराष्ट्रातील काँग्रेसचे पुढारी आपण सामना वाचत नसल्याचा टेंभा मिरवतात हा त्यांचा प्रश्न, पण सोनिया गांधी ‘सामना’ची दखल घेतात, हे काल पुन्हा एकदा दिसून आले आहे,” अशा शब्दात सामना अग्रलेखातून नाना पटोलेंना टोला लगाण्यात आला आहे.
Read Also :
- “केंद्रीय अर्थमंत्रालयाचे वित्त नियोजन एका वेगळ्याच दर्जाचे…”
- नाना पटोले म्हणाले ‘सामना’ वाचत नाही, आता शिवसेनेने अग्रलेखातून दिले उत्तर…
- काँग्रेसने केले मान्य, नरेंद्र मोदींनी देशाला दिल्या “या” तीन गोष्टी
- सुप्रीम कोर्ट सगळे आदेश देत असेल, तर मोदी सरकार काय करतंय?; बाळासाहेब थोरातांचा परखड सवाल
- “नानांनी कचराच करून टाकला…”