मुंबई : राज्याने राज्य राखीव पोलीस दलातील जवानांच्या बाबतीत आज एक महत्वाचा निर्णय घेतला असून, राज्य राखीव पोलीस दलातील जवानांच्या प्रश्नांबाबत आज मंत्रालयात गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
या बैठकीत जवानांच्या जिल्हा पोलीस दलातील बदलीकरता आवश्यक असणारी सेवेची अट ही १५ वर्षांवरून १२ वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, जिल्हा पोलीस दलातील बदलीनंतर जिल्हा पोलीस मुख्यालयातील कर्तव्य कालावधी देखील ५ वर्षांवरून २ वर्षांवर करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, या एसआरपीएफ जवानांसाठी घेतलेल्या या निर्णयाबद्दल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गृहमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
जवानांच्या जिल्हा पोलीस दलातील बदलीकरता आवश्यक असणारी सेवेची अट कमी करून घेण्याच्या प्रश्नाचा आदित्य ठाकरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच, त्यांच्याच विनंतीवरुन एसआरपीएफ जवानांच्या या प्रश्नाबाबत समितीही गठीत करण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारशीनुसार आज झालेल्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. या निर्णयाबद्दल मंत्री श्री. ठाकरे यांनी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे, अतिरिक्त पोलीस महासंचालक अर्चना त्यागी यांचे आभार मानले आहेत.
Read Also :
- रक्षा खडसेंचे शरद पवारांना पत्र, करून दिली जुन्या वादयाची आठवण
- मोदींच कौतुक करण्यासाठी केला ‘ध’ चा ‘मा’; The Guardian च केलं The Daily Guardian
- पत्रकार, कॅमेरामन यांना तात्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा – देवेंद्र फडणवीस
- मराठा समाजाला एप्रिल फूल करण्याचा प्रयत्न करु नका – भाजप नेते आशिष शेलार
- कोल्हापुरात गोकूळ निवडणुकीनंतर आता कोरोनाच्या मुद्द्यावरून महाडिक – पाटील गट आमने सामने