मुंबई : राज्यातील प्रसिद्धी आणि दृकश्राव्य माध्यमांतील सर्व पत्रकार, कॅमेरामन यांना तत्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करून लसीकरणात त्यांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी आज (बुधवार) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.
फडणवीस आपल्या पत्रात म्हणतात, “देशातील सुमारे १२ राज्यांत प्रसिद्धी आणि दृकश्राव्य माध्यमांतील पत्रकारांना फ्रंटलाईन वकर्स म्हणून जाहीर करण्यात आले आहे. दुर्दैवाने, महाराष्ट्रात मात्र हा निर्णय अद्यापही प्रलंबित आहे.” तसेच, “राज्यातील अनेक ज्येष्ठ पत्रकार, पत्रकारांच्या विविध संघटना यासंदर्भात सातत्याने मागणी करीत आहेत. परवा तर राज्यातील पत्रकारांनी ऑनलाईन माध्यमांतून सांकेतिक आंदोलन देखील केले.
राज्यातील प्रसिद्धी आणि दृकश्राव्य माध्यमांतील सर्व पत्रकार, कॅमेरामन यांना तत्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करून लसीकरणात त्यांना प्राधान्य देण्याबाबत मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी यांना पत्र.. pic.twitter.com/q7Peo26NP5
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 12, 2021
कोरोना साथीच्या पहिल्या लाटेत आपण अनेक पत्रकारांना मुकलो. या दुसऱ्या लाटेत देखील या रोगाला बळी पडलेल्यांची संख्या मोठी आहे. अशात त्यांच्या सुरक्षेची. जिवितेची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांना फ्रंटलाईन वर्कर्स जाहीर केल्यास आपसुकच लसीकरणात त्यांना प्राधान्य मिळेल..” असेही फडणवीसांनी म्हटलं आहे.
Read Also :
- आम्ही देखील पाहून घेऊ ‘सामना’चा “सामना”, पुढे कसा करायचा!
- नाना भाऊ सांगाना, आम्ही जगाव की मराव?… नेमक काय कराव?
- उद्धव ठाकरेंना बारामतीची हवा जास्तच मानवलेली दिसतेय; गोड बोलणे आणि पाठीत सुरी खुपसणे
- सामनामधून काँग्रेसला पुन्हा शालीतून जोडे, थेट वर्मावरच ठेवले बोट
- “केंद्रीय अर्थमंत्रालयाचे वित्त नियोजन एका वेगळ्याच दर्जाचे…”