भंडारा : जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीन नुकसान झालेल्या एका शेतकऱ्याने नाना पटोले यांना संतप्त साद घातली आहे. नाना भाऊ सांगाना, आम्ही जगाव की मराव……? नेमक काय कराव….? अशी साद घालत या शेतकऱ्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले आहे.
एकीकडे कोरोनाचे संकट घोंघावत असताना दुसरीकडे भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर लाखनी तालुक्यातील जेवणाळा गावातील अवकाळी पाऊस आणि गारपीटीने नुकसान झालेल्या एका शेतकऱ्याने नाना पटोले यांना भावनिक साद घातली आहे. भंडारा जिल्ह्यात सलग चार दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली असून ह्या वेळी आलेला अवकाळी पाऊस हा सोसाटयाच्या वाऱ्यासह गारपीट युक्त असल्याने ह्या पावसाने भंडारा जिल्ह्यातील अनेक भागात आपला हाहाःकार माजवला आहे.
काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या मतदार संघात ही ह्या अवकाळी पावसाने हाहाःकार माजवला आहे. जेवणाला येथील शेतकरी प्रमोद भूते यांचे उन्हाळी धान अक्षरक्ष: मोडून गेले आहे. तर काही भागात धान पिकांचे धानाचे लोंबे गळून पडल्याने पिकांची कांडी फक्त शिल्लक राहिली आहे. त्यामुळे विवंचनेत पडलेल्या प्रमोद भूते यांची चक्क नाना पटोले यांना आर्त हाक दिली आहे. कोरोनाचे टेंशन संपले नाही तर लगेच दुसरीकडे अवकाळी पावसाने होत्याचे नवते केले. सांगांना नाना भाऊ आम्ही जगाव की मराव…? नेमके काय करावे….?, अशी आर्त हाक या शेतकऱ्याने दिली आहे.
Read Also :
- सामनामधून काँग्रेसला पुन्हा शालीतून जोडे, थेट वर्मावरच ठेवले बोट
- “केंद्रीय अर्थमंत्रालयाचे वित्त नियोजन एका वेगळ्याच दर्जाचे…”
- मराठा समाजाला एप्रिल फूल करण्याचा प्रयत्न करु नका – भाजप नेते आशिष शेलार
- भाजपच्या नेत्यांचा गोव्याला जाण्याचा प्रवासाचा खर्च रुपाली चाकणकर देणार
- उद्धव ठाकरेंना बारामतीची हवा जास्तच मानवलेली दिसतेय; गोड बोलणे आणि पाठीत सुरी खुपसणे