मुंबई : शिवसेनेच्या सामनामधून विधानसभा निवडणुकांमधल्या काँग्रेसच्या कामगिरीचे मूल्यमापन करताना, काँग्रेसच्या नेतृत्वावर अनेक शंका उपस्थित केल्या गेल्या होत्या. तसेच संजय राऊत यांनी देखील, माध्यमांशी बोलताना, “सध्याच्या निवडणुकांचे निकाल बघता, ममतांनी भविष्यात देशात विरोधी पक्षाचा चेहरा म्हणून पुढे यावं. देशाला भक्कम अश्या तिसऱ्या आघाडीची गरज आहे. तशी सगळ्यांचीच इच्छा आहे. नक्कीच याचा आत्मा काँग्रेस असेल. त्यांच्याशिवाय देशात कोणतीही आघाडी होणार नाही. मात्र, काँग्रेसने अजून मुसंडी मारणं गरजेचं आहे,” असं म्हटलं होतं.
यावर, काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, “आम्ही संजय राऊतांकडे दुर्लक्ष करतो. तसेच आम्ही सामनादेखील वाचत नाही. केवळ इतरांवर टीका करून पक्ष मोठा होत नसतो, याची कदाचित संजय राऊत यांना जाणीव नसावी,” असा हल्लाबोल केला होता.
दरम्यान, आज परत सामनामधून काँग्रेस नेत्यांना शालीतून जोडे लगावले गेले आहेत. तसेच, संजय राऊत यांनी अग्रलेखातून अप्रत्यक्षपणे नाना पटोले यांच्यावर निशाणा साधत, “महाराष्ट्रातील काँग्रेसचे पुढारी आपण सामना वाचत नसल्याचा टेंभा मिरवतात हा त्यांचा प्रश्न, पण सोनिया गांधी ‘सामना’ची दखल घेतात, हे काल पुन्हा एकदा दिसून आले आहे, अशा शब्दात टोला लगावला आहे.
या दोन नेत्यांमध्ये खडाजंगी अजूनही सुरूच असून, आता याला प्रत्युत्तरादाखल आज पत्रकारांशी बोल असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, “शिवसेनेच्या ‘सामना’मध्ये काय लिहिले आहे, ते बघून ‘सामना’चा “सामना” पुढे कसा करायचा हे योग्य प्रकारे ठरवू, असा शाब्दिक इशारा दिला आहे.
Read Also :
- नाना भाऊ सांगाना, आम्ही जगाव की मराव?… नेमक काय कराव?
- भाजपच्या नेत्यांचा गोव्याला जाण्याचा प्रवासाचा खर्च रुपाली चाकणकर देणार
- मराठा समाजाला एप्रिल फूल करण्याचा प्रयत्न करु नका – भाजप नेते आशिष शेलार
- … त्यामुळे सीबीआय आणि ईडीकडून माझी चौकशी केली जात असावी – अनिल देशमुख
- ‘जायचंय पंढरपूरला पण गाडी निघाली गोव्याला’