मुंबई : एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले व सध्या मुंबई शहर दहशतवाद विरोधी पथकात सेवेत असलेले पोलीस निरीक्षक दयानंद नायक यांची गोंदियात बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या निर्णयाला काही दिवसातच स्थगिती देण्यात आली आहे.
दहशतवादी विरोधी पथकातून थेट गोंदियात पाठवण्यात आलं होतं. पण आता ते दहशतवादी विरोधी पथकात कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या बदलीला मॅटकडून स्थगिती देण्यात आली आहे.
नायक यांची दहशतवाद विरोधी पथकातून बदली केली होती. 6 मे रोजी जारी करण्यात आलेल्या या आदेशानुसार गोंदियातील जात प्रमाणपत्र पडताळणी उपसमितीच्या कार्यालयात त्यांची बदली करण्यात आली होती.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पोलीस दलात मोठ्या प्रमाणात फेरबदल सुरू आहेत. अँटिलिया स्फोटकं प्रकरण आणि मनसुख हिरन हत्या प्रकरण पुढे आल्यानंतर बदल्यांचा धडाकाच लावण्यात आला आहे. दया नायक यांनी गेल्या वर्षभरात अनेक हाय प्रोफाइल प्रकरणं हाताळली आहेत. मुख्य म्हणजे मनसुख हिरन हत्येचा तपास करण्यासाठी ज्या टीम नेमल्या होत्या. त्यातील जूहू एटीएसच्या टीमला दया नायक लीड करत होते.
Read Also :