मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काही नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट देखील घेतली होती. आता मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी 2 दिवसीय विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी भाजप नेत्याने केली आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विधिमंडळाचं दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी माजी विधानसभा अध्यक्ष आणि भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांनी केली आहे.
हरिभाऊ बागडे यांच्या आधी शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी देखील विशेष अधिवेशनाची मागणी केली होती. त्यांनी लोकसभेचे तीन दिवसीय अधिवेशन घेण्यात यावे अशी मागणी केली होती.
आता हरिभाऊ बागडे यांनी राज्य मागासवर्ग आयोग नेमणे, आयोगाचा अहवाल स्वीकारणे, तो केंद्रीय आयोगाकडे पाठवणे, ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेत त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहिलेलं पत्र सोपवले होते. तसेच, या प्रश्नावर लवकरच पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याचे देखील म्हटले होते.
Read Also :
- ‘राजेश टोपेंचे ‘ते’ विधान म्हणजे खोटारडेपणाचा कळस’
- 12 विरोधी पक्षांचे पंतप्रधान मोदींना पत्र, केल्या ‘या’ मागण्या
- ‘सुप्रीम कोर्टाने टास्कफोर्स स्थापन करून मोदींच्या अपयशावर शिक्कामोर्तब केले’
- लॉकडाऊन वाढवला, लसीकरण स्थगित; ठाकरे सरकारचा निर्णय
- बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार वादग्रस्त वक्तव्याने पुन्हा चर्चेत, म्हणाले…