सोलापूर : रयत क्रांती संघटनेचा जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा या अभियानाचा शेवट काल सोलापूर येथील टेंभुर्णी येथे झाला. यावेळी रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. अशातच भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी या कार्यक्रमाचे फोटो ट्विट करत करत राज्य सरकारला इशारा दिला आहे.
“एका बाजुला मनसे आणि दुसऱ्या बाजुला माफिया सेना”; अयोध्या दौऱ्याबाबत सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया
सोलापुर येथील झालेल्या कार्यक्रमात लोकांची देखील मोठी उपस्थित होती. यावेळी देवेंद्र फडणवीस यांचा जोरदार भाषण झालं. याच कार्यक्रमाचे फोटो ट्विट करत गोपीचंद पडळकर म्हणाले की, हा जमलेला महासागर सांगतो की, शेतकऱ्यांना या मुर्दाड सरकार विरोधात प्रचंड चिड आहे. शेतकरी प्रश्नांवर सरकारला जागं करण्यासाठी मुलुख मैदानी तोफ देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा अभियानाची समारोप सभा झाली. असं त्यांनी त्यात म्हटलं आहे.
“फडणवीस साहेब लोकांचा गैरफायदा किती घेणार, देशाचे तुकडे करण्याचा मानस आहे का?”
सध्या सोलापुरमधील उजनी धरणाच्या पाण्यावरून राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. उजनी धरणाचा पाणी बारामतीला जात असल्याचा आरोप केला जात आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, उजनी बांधताना या धरणातील पाणी सोलापूर जिल्हाला मिळेल. तसेच, बॅंक वॉटर दुष्काळग्रस्त गावांना मिळेल, मात्र, आता या पाण्यावर काही लोकांची नजर गेली आहे. हे पाणी पळविण्याचा प्रयत्न त्यांनी चालविला आहे. काहींची तहानच भागत नाही, सगळं आमच्याच ताट्याच पाहिजे, असं त्यांना वाटतं, षडयंत्र करून शेतकऱ्यांचे कारखाना बुडविण्यात आले आहेत आणि हजारो कोटींचे कारखाने कवडीमोल किमतीने विकत घेतले जात आहेत. या लोकांना काटा मारला ती आपण त्यांना जाब विचारू शकत नाही. कारण तो आता खासगी कारखाने झाले आहेत. असंही फडणवीस यांनी सांगितले.
नवाब मलिकांचा पाय आणखी खोलात; दाऊदच्या लोकांसोबत व्यवहार केल्याचा न्यायालयाचं निरीक्षण
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा हा राज्यव्यापी शेतकरी दौरा झाला. शेतकरी, शेत मजूर, बलुतेदार ह्या साऱ्या गावगाड्याच्या माणसांसाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी लढणारी रयत क्रांती संघटनांनी आयोजन केले होते.
Read also:
- नवाब मलिक प्रकरणांवरून फडणीस संतापले; म्हणाले.. की, जेवढा अट्टाहास मलिकांना वाचवण्यासाठी…;
- अजून किती काळ नवाब मलिकांची पाठराखण करणार? राजीनामा घ्या; चंद्रकांत पाटील
- “पवार साहेब तुमचे डायरेक्ट दाऊद सोबत संबंध नाही ना?” नवाब मलिक प्रकरणांवरून निलेश राणेंचा तिखट सवाल
- नवाब मलिकांचा पाय आणखी खोलात; दाऊदच्या लोकांसोबत व्यवहार केल्याचा न्यायालयाचं निरीक्षण
- जितेंद्र आव्हांडाचं एक ट्विट; अन् चार जणांवर कारवाईचा बडगा