मुंबई : कोरोना व्हायरस महामारीमुळे राज्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांना ऑक्सिजन, बेड्स आणि औषध देखील उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. थेट न्यायालयातून बेड उपलब्धतेसाठी फोन करण्यात आल्यानंतर ही वस्तुस्थिती अधिकच समोर आली. यावरून न्यायालयाने ठाकरे सरकारला सुनावले. याच पार्श्वभूमीवर आता भाजप नेते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
स्वताच स्वताच्या कौतुकाची टीमकी वाजवत त्यातच मश्यगुल असणाऱ्या ठाकरे सरकारचे वाभाडे आज न्यायालयाने काढले. जनहितापेक्षा स्वकौतुकासह बेछूट व बेजबाबदार विधान करण्याची सवय असलेल्या राज्य सरकारने तिथेही न्यायालयाची दिशाभूल करत वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला पण थेट फोनच लावायला सांगत तोही उघडा पडला. या खरडपट्टी नंतर सरकार भानावर येऊन काही जनहिताचे निर्णय घेईल का? हा खरा प्रश्न आहे, अशा शब्दात उपाध्ये यांनी सरकारवर निशाणा साधला.
स्वताच स्वताच्या कौतुकाची टीमकी वाजवत त्यातच मश्यगुल असणाऱ्या @OfficeofUT सरकारचे वाभाडे आज न्यायालयाने काढले. जनहितापेक्षा स्वकौतुकासह बेछूट व बेजबाबदार विधान करण्याची सवय असलेल्या राज्यसरकारने तिथेही न्यायालयाची दिशाभूल करत वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला पण थेट फोनच..२
— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 12, 2021
सुनावणीदरम्यान मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता यांनी राज्यातील रेमडेसीवीर व रुग्णालयांतील खाटांच्या व्यवस्थापनातील ढिसाळपणाबद्दल सरकारविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यातील ऑक्सिजनच्या गरजेएवढा पुरवठा केंद्र सरकारकडून झाल्याचे सरकारकडून मान्य करण्यात आले. रेमडेसीवीरच्या मागणीबाबतही अवास्तव चित्र उभे करत असून केंद्रावर खापर फोडण्याची राज्य सरकारची खेळीदेखील न्यायालयात उघडकीस आली, असे ते म्हणाले.
एकीकडे राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे राज्य सरकार सांगते आणि रेमडेसीवीरची मागणी मात्र कायम ठेवते याबद्दल तीव्र आश्चर्य व्यक्त करून न्यायालयाने सरकारला धारेवर धरले. रेमडेसीवीरची गरज असलेल्या रुग्णास रुग्णालयातूनच ते मिळाले पाहिजे हे पाहण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले असताना हे आदेशधाब्यावर बसवून रुग्णांनाच रेमडेसीवीरसाठी पायपीट करावी लागतेयाबद्दलही न्यायालयाने नाराजी व्यक्तकेली. खाटांच्या उपलब्धतेबद्दलचा सरकारचा दावादेखील फोलअसल्याचे न्यायालयातचस्पष्ट झाल्याने राज्य सरकारची चांगलीच पंचाईत झाली, असे केशव उपाध्ये म्हणाले. सोबतच त्यांनी न्यायालयातील सुनावणी दरम्यानचा संवाद देखील शेअर केला.
Read Also :