मुंबई : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. याच पार्श्वभूमीवर चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर होते. मुख्यमंत्र्यांच्या या एकदिवसीय दौऱ्यावर आता भाजपकडून टीका केली जात आहे. मुख्यमंत्री काय करतो, कसा वागतो, हे माहित नसेल तर कोणाकडून तरी शिकून घ्या, असा जोरदार टोला भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
निलेश राणे म्हणाले की, मुख्यमंत्री कोकण दौऱ्यावर आले आणि तसेच परत गेले. काहीही दिले नाही व दोन दिवसांनी जाहीर करतो, असे सांगून गेले. मग तुम्ही आला तरी कशाला ? कोणी बोलवल तुम्हाला ? ह्यांना मुख्यमंत्री पदच कळालेले नाही, हे मज्जा मारत आहेत. अधिकाऱ्यांना देखील कळले नाही तुम्ही कशासाठी आलात.
मुख्यमंत्री कोकण दौऱ्यावर का आले?? pic.twitter.com/w0pe7RmiC3
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 21, 2021
येण्या-जाण्यातच तुमचा वेळ गेला. कसली पाहणी केली ? नुकसानग्रस्तांना भेटला देखील नाही. आल्यापासून हा मुख्यमंत्री महाराष्ट्राची वाटच लावत आहे, अशी जोरदार टीका निलेश राणेंनी केली.
निसर्ग चक्रीवादळाची मदत अद्याप दिलेली नाही. त्यापेक्षा कोकणात येऊ नका. जर मदत जाहीर करायचीच नव्हती, तर आलाच कशाला ? रोज बसता तसे घरी बसा. लोकांकडे अन्न, पाणी, लाइट नाही अशावेळी तुम्ही केवळ फेरफटका मारून निघून जाणार. तुम्हाला काही लाज वाटते का नाही ? तुम्हाला मुख्यमंत्रीपदाची जाणीव तरी आहे का ? काय करावे लागते, कसे वागावे लागते हे कोणाकडून तरी शिकून घ्या. अशा मुख्यमंत्र्याची लाज वाटते, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला.
Read Also :