मुंबई : भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर संतोष परब हल्लाप्रकरणी गुन्हा दाखल आहे. सिंधुदुर्ग पोलिस त्यांना अटक करणार होते. मात्र, त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आज न्यायालयाने राणेंना अटकेपासून दिलेला कायम ठेवला असून याप्रकरणी सोमवारी निकाल घोषित करण्यात येणार आहे. तोपर्यंत नितेश राणे यांना अटक करता येणार नाही. त्यामुळे नितेश राणेंना आता हायकोर्टात तर दिलासा मिळणार का? की राणेंना अटक होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
पंतप्रधानांनी बोलावलेल्या बैठकीला उद्धव ठाकरेंची दांडी; मुख्यमंत्र्यांच्या जागी कोणाची हजेरी?
शिवसेना नेते संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी मुख्य आरोपीला दिल्लीवरून अटक करण्यात आली होती. त्यानंतर भाजप आमदार नितेश राणेंना अटक करावी, अशी मागणी शिवसैनिकांनी लावून धरली होती. त्यानंतर सिंधुदुर्ग पोलिसांनी नितेश राणेंना ताब्यात घेण्यासाठी फिल्डींग लावली होती. पण, त्यापूर्वीच नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती. पण, न्यायालयानं त्यांचा जामीन फेटाळून लावला होता. त्यानंतर राणेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयानं त्यांना सुनावणी पूर्ण होईपर्यंत अटक करता येणार नाही, असं राज्य सरकारला सांगितलं होतं. राज्य सरकारने देखील तशी हमी दिली होती.
भाजपला धक्यावर धक्के; तब्बल सात आमदारांचे राजीनामे, मोदी लाट ओसरली?
नितेश राणेंच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयानं दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतला. तसेच निर्णय राखून ठेवला असून सोमवारी निकाल घोषित करण्यात येणार आहे. सध्या तरी त्यांची अटक पुढील सुनावणीपर्यंत टळली आहे. दरम्यान, या प्रकरणात सहआरोपी मनिष दळवी यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर युक्तीवाद झाला. मनीष दळवी हे जिल्हा बँकेवर निवडून आलेले अध्यक्ष आहेत.
Read also:
- मराठी पाट्यांचं श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नका; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा गर्भित इशारा
- बांगड्या विकू, मात्र आंदोलन सुरुच राहील; एसटी कर्मचाऱ्यांनी शोधला जगण्याचा नवा पर्याय
- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या विरोधात शिवसेना उमेदवार देणार? संजय राऊतांची मोठी घोषणा
- कोरोनामुक्त होताच रोहित पवारांनी मतदारसंघ गाठला; कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणनिती?
- मंत्री छगन भुजबळ पुन्हा अडचणीत? अंजली दमानियांचे न्यायालयात आवाहन… काय नेमकं प्रकरणं…