मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीत विजय संपादन केल्यानंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीत देखील भाजप विजयाच्या प्रतिक्षेत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान झालं. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात उमेदवार दहाव्या जागेसाठी भाजप आणि काॅंग्रेसमध्ये चुरस बघायला मिळणार आहे.
आज कुणीही पावसात भिजलं तरी..; गोपीचंद पडळकरांचा शरद पवारांना टोला
विधान परिषदेच्या निवडणुकीकरीता भाजपने 30 मतांचा कोठा ठेवला आहे. पहिल्या चारही उमेदवारांसाठी 30 मतांचा कोठा ठरविला असून उमेदवाराला विजयासाठी 26 मते आवश्यक आहेत. त्यामुळे उरलेली मते ही पाचव्या उमेदवार म्हणजे प्रसाद लाड यांना देण्यात येणार आहेत. प्रसाद लाड यांना जिंकण्यासाठी अजून १६ मतांची गरज आहे.
“लक्ष्मण जगतापसारखा नेता कोणीच असू शकत नाही”; देवेेंद्र फडणवीसांनी मानले आभार
भाजपकडे सध्या १०६ मतांचा कोटा ठरवला असून त्यांना सहा अपक्ष आमदारांचा पाठिंबा देखील आहे. त्यामुळे पहिल्या पंसतीची १२० मते चार उमेदवारांना जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येकी चार म्हणजे ही १६ मते लाड यांना ट्रान्सफर करण्यात येणार आहे. लाड यांना अतिरिक्त १६ मते मिळावतीत म्हणूनच भाजपने ३० मतांचा कोटा ठरवल्याचं सांगितलं जात आहे.
“पुढचा मुख्यमंत्री प्रहारचाच, हम बोलेंगे वैसे ही सरकार चलेगा”; बच्चू कडू
शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 32 मतांचा कोटा ठरविला आहे. त्यामुळे काॅंग्रेसच्या भाई जगताप यांच्यासाठी दुसऱ्या फेरीची मतमोजणी झाल्यास शिवसेनेची अतिरिक्त 12 मतं ही भाई जगताप यांना मिळतील. काॅंग्रेसने आपल्या पहिल्या उमेदवाराला म्हणजे चंद्रकांत हंडोरे यांना 29 मतं दिल्याची माहिती आहे. त्यामुळे काॅंग्रेसकडे अतिरिक्त 15 मते आहेत. यामध्ये शिवसेनेची 12 आणि काॅंग्रेसची 15 अशा एकूण 27 मतांचा कोटा मिळवून भाई जगताप विजयी ठरू शकतात.
Read also:
- राष्ट्रवादीची पहिल्या पंसतीची मते निंबाळकर यांना, खडसेंना दुसऱ्या पसंतीची मते
- देश वेठीस धरण्यासाठी विरोधकांची धंदेवाईक दलालांशी हातमिळवणी! गोपीचंद पडळकर यांचा आरोप
- काॅंग्रेसने घेतलेले आक्षेप निवडणुक आयोगाने फेटाळले, मतमोजणीला सुरूवात होण्याची शक्यता?
- काॅंग्रेसला अवदसा आठवली, योध्यांचाही अपमान, निष्ठावंतांची किंमतच कशी कळणार?
- भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसचा आक्षेप