उल्हासनगर – उल्हासनगर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी कलानी परिवाराच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर उल्हासनगरात राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उल्हासनगरातील टीम ओमी समर्थक २२ नगरसेवकांना पक्षात प्रवेश केला होता. मात्र भाजपाने याआधी याचिकेत नऊ बंडखोर नगरसेवकांच्या पात्रता रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी नऊ बंडखोर नगरसेवकांच्या अपात्रतेची याचिका कोकण विभागीय आयुक्तांनी फेटाळली आहे. त्यामुळे उल्हासनगरमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे तसेच या नगरसेवकांच्या निवडणूक लढवण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
“ममताजी महाराष्ट्रातील उद्योगांना पश्चिम बंगालमध्ये या असं आमंत्रण देतायेत आणि शिवसेना मदत करतेय का?
उल्हासनगर महापालिकेत २०१९ मध्ये झालेल्या महापौर निवडणुकीत भाजपाच्या नऊ नगरसेवकांनी शिवसेनेच्या महापौरपदाच्या उमेदवाराला ऐनवेळी मतदान केल्याने भाजपाला महापौर पदावर पाणी सोडावे लागले होते. याविरुद्ध भाजपच्या गटनेत्यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे याविरुद्ध दाद मागितली होती. नऊ नगरसेवकांचा अपात्र करावे अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. यावर बराच काळ सुनावणी चालली. निकालाबाबत दिरंगाई होत असल्याचा आरोप करत भाजपने उच्च न्यायालयात या प्रकरणी वेळीच आणि तातडीने निकाल देण्याची मागणी केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने कोकण विभागीय आयुक्तांना ३० नोव्हेंबरपर्यंत या प्रकरणाचा निकाल लावण्याचे आदेश दिले होते.
त्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी या प्रकरणी शेवटची सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर ३० नोव्हेंबर रोजी या नऊ नगरसेवकांच्या प्रकरणी दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळली आहे. कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाने याबाबत कळवले असल्याची माहिती नगरसेवकांचे वकील असलेले प्रकाश कुकरेजा यांनी दिली आहे.
ममता बॅनर्जी शरद पवारांच्या भेटीसाठी ‘सिल्व्हर ओक’वर दाखल; तिसऱ्या आघाडीवर होणार चर्चा?
या नगरसेवकांमध्ये नुकत्याच राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या टीम ओमी कलानीच्या सदस्यांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीतील उट्टे काढण्यासाठी या नगरसेवकांनी भाजपला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर बंडखोरी करत शिवसेनेला मतदान केले होते. त्यामुळे संख्याबळ असूनही भाजपला पराभवाचा धक्का बसला. याप्रकरणी कोकण विभागीय आयुक्तांकडे दाखल करण्यात आलेल्या याचिकेत यांना नगरसेवकांना अपात्र ठरवण्याची मागणी करण्यात आली होती. भाजपच्या याचिकेवर निकाल सकारात्मक निकाल झाला असता तर या नऊ नगरसेवकांना पुढील सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यापासून निर्बंध घातले गेले असते.
Read Also :
- साहित्य संमेलनातील राजकीय नाट्यावर पडदा; भुजबळांच्या मध्यस्थीनंतर फडणवीस उपस्थित राहणार
- सुरेश म्हात्रे यांनी बांधले हातावर घड्याळ; अजित पवारांच्या उपस्थितीत पार पडला पक्षप्रवेश सोहळा
- कोरोना निर्बंधांबाबत अजित पवार यांचे मोठे वक्तव्य; परराज्यातून येणाऱ्यांसाठी आणि शाळांबद्दल म्हणाले…
- रत्नागिरी जिल्हा बँक अध्यक्षपदी डॉ. तानाजीराव चोरगे यांची वर्णी
- “काँग्रेस कधी उटांसारखी तिरकी चालत नाही”; ममतांच्या दौऱ्यावरून अशोक चव्हाणांनी झापले