महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच सत्तेतून बाहेर पडून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना भाजप सोबत युतीचा रास्ता मोकळा करून देणार असल्याची माहिती समोर येत आहे. सुप्रीम कोर्टाचा सत्तासंघर्षाच्या निकालाची टांगती तलवार शिंदे यांच्या डोक्यावर आहेत तर दुसरीकडे अजित यांना मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न साकार करण्याची घाई सुद्धा आहेच तसंच त्यांना राष्ट्रवादीच्या ३५-४० आमदारांचा पाठिंबा आहे, त्यामुळे पक्षांतर विरोधी कायदा लागू होणार नाही.
तथापि, त्यांना पाठिंबा असणाऱ्या काही नेत्यांची इच्छा आहे की अजित पवार पक्षाचे संस्थापक शरद पवार यांची संमती मिळावी, जेणेकरून 2019 मध्ये भाजपसोबत सरकार स्थापन करून ८० तासांच्या आत पडले अशी फसवणूक टाळता येईल, कारण तेव्हा शरद पवार यांच्या मर्जी विरुद्ध ते सरकार प्रस्थापित झाले होते पण दुसरी सत्याची बाब अशी कि, शरद पवार भाजपसोबत जाण्यास तयार नाहीत.
हेही वाचा… ‘फडणवीस हे जादूगार, भविष्यात काय जादू करायची हे जादूगरच ठरवतो’
त्यावेळी शरद पवार यांनी अजित पवार यांना फोन करून सांगितले कि ते भगव्या पक्षाशी जुळवून घेऊन त्यांच्या राजकीय कारकिर्दीला कलंक लावायला तयार नाहीत. अजित पवार यांच्या समर्थकांना याची जाणीव आहे की शरद पवारांच्या जनभावना बदलण्याच्या क्षमतेमुळे पक्षाच्या कुलगुरूंच्या विरोधात जाणे म्हणजे राजकीय आत्महत्या असू शकते,” अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सावध आमदारांनी शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी अजित पवार यांच्यावर दबाव आणला आहे.
विशेष म्हणजे अजित पवार हे ८ एप्रिलला १७ तास नॉट रिचेबल होते तेव्हा ते अंतिम करार करण्यासाठी भाजप नेते अमित शहा यांना भेटण्यासाठी त्यांनी दिल्लीला चार्टर्ड फ्लाइट घेतली होती, असे सूत्रांनी सांगितले. “पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे खातेवाटपाचा निर्णय घेण्यासाठी त्यांच्यासोबत होते,” एका सूत्राने सांगितले. भाजपने आधीच शिंदे यांना डावलल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.
हेही वाचा… “ना खाऊंगा, ना खाने दुंगा म्हणाणाऱ्या मोदींचा खरा चेहरा उघड”
‘खरंतर भाजपची स्थिती अत्यंत कठीण आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह गमावले असले तरी उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य यांची लोकप्रियता वाढली आहे. भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार, राज्यातील लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी महाविकास आघाडीला 33 जागा मिळतील. आणीत भाजपला महाराष्ट्र गमावणे परवडणारे नाही. आणि भाजपला मुख्यमंत्री म्हणून मराठा चेहरा हवा आहे कारण त्यांच्याकडे 35% मतदार आहेत, त्यामुळे अजित पवार यांना खेचण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. अशी सूत्रांची माहिती आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी अलीकडेच नवी दिल्लीत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली तेव्हा प्रफुल्ल पटेल यांची अनुपस्थिती लक्षात आली. ते आता स्पष्ट झाले आहे कि सुनील तटकरे यांच्यासमवेत अजित पवार यांच्या भाजप युतीमध्ये जाण्यामागचे खरे सूत्रधार आहे प्रफुल्ल पटेल आहेत.
त्यामुळे शिंदे सरकारला बाजूला करून अजित पवार भाजपसोबत युती करत पुन्हा शपथविधी होणार का? तसेच यावेळी शरद पावर यांची संमतीने सरकार स्थापन होणार का? असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहे.
Read also
हेही वाचा… महाविकासआघाडीच्या सभेत का बोलणार नाही?, अजित पवारांचं स्पष्टीकरण
हेही वाचा… अतिक आणि अशरफ याचं एन्काऊंटरचं कनेक्शन नाशकात, STF ने एकाला घेतलं ताब्यात..!
हेही वाचा… माजी खासदाराच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या काकांना सीबीआयकडून अटक
हेही वाचा… नाशिकमध्ये राजकीय भूकंप, भुजबळांचे निष्ठावंतसह माजी नगरसेवक लवकरच भाजपमध्ये