नवी दिल्ली : वर्षाच्या अखेरीच देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. तेलंगणा, मिझोराम यांच्यासह मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड अशा पाच राज्यांमध्ये आगामी काही महिन्यात निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांसाठी भाजपने कंबर कसली असून तीन महत्वाच्या राज्यांमध्ये मोदी तीन राज्यांत धक्कातंत्राचा वापर करणार असून तीन मुख्यमंत्र्यांना बदलणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.
हेही वाचा…अजिदादांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भंगणार ? भाजप नेत्यांनी दिले ‘हे’ संकेत
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमन सिंह यांना पुन्हा संधी मिळणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. त्यांच्याजागी दुसरा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी भाजप शोधत असल्याची माहिती समोर आली आहे. वसुंधरा या दोनवेळा राजस्थानच्या मुख्यमंत्री होत्या. तर रमन सिंह तीनवेळा छत्तीसगडचे मुख्यमंत्री होते. शिवराज सिंह सध्य मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आहेत.
हेही वाचा…भाजपच्या ‘या’ खासदारांचे तिकीट कापणार, फडणवीस-शाह यांची बंद दाराआड चर्चा, नव्या उमेदवारांना संधी
भाजपने तिन्ही राज्यात एकत्रित नेतृत्वाखाली निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे या तिघांपैकी एकालाही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवले जाणार नाही. या तीन राज्यांमध्ये भाजप त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांचा शोद घेत आहे. रमनसिंग यांना तिकीटच दिले न जाण्याची शक्यता आहे. तर शिवराज सिंह चौहान आणि वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्री चेहरा म्हणून प्रोजक्ट केले गेले नाही. भविष्यातही ही शक्यता दिसत नाही.
हेही वाचा…पिंपरी-चिंचवडमध्ये ‘आयआयएम’ची शाखा उभारण्याचा संकल्प! महेश लांडगे यांची मागणी, फडणवीसांना दिले निवेदन
दरम्यान, मध्य प्रदेशात तीन केंद्रीय मंत्र्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. यामुळे शिवराज सिंहांचा पत्ता कट झाल्याचे बोलले जात आहे भाजपा राजस्थान आणि छत्तीसगडमध्येही हाच फॉर्म्युला वापरेल असा अंदाज बांधला जात आहे. राजस्थानमध्ये भाजपने आपली निवडणूक टीम जाहीर केली तेव्हाही अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. यामध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि त्यांच्या समर्थकांना स्थान देण्यात आले नव्हते तेव्हा भाजपाने वसुंधरा राजे प्रचार करतील असे सांगितले गेले होते.
READ ALSO :
हेही वाचा…“रोहित पवारांना नोटीस का आली ? याबद्दल माझ्या मनात 100 टक्के..,” आव्हाडांचा रोख नेमका कुणाकडे ?
हेही वाचा…“शरद पवारांचा विचार नथुराम गोडसे यांच्या पायाच्या धुळी इतका सुद्धा नाही,” गुणरत्ने सदावर्तेंची जोरदार टिका
हेही वाचा…मोठी बातमी..! सुप्रीम कोर्टात विधानसभा अध्यक्षांविरोधात ठाकरे गटाची याचिका? सुनावणीकडे लक्ष
हेही वाचा…” ती लोक मराठी लोकांना खालच्या दर्जाचे, मांस खाणारे म्हणून हिनवतात म्हणून घरे मिळत नाहीत”, आव्हाडांचं ‘त्या’ व्हिडीओवरून मोठं भाष्य
हेही वाचा…एकनाथ शिंदेंच्या सेनेत इनकमिंग सुरूच, ठाकरेंचे ‘तीन’ शिलेदार शिंदेंच्या सेनेत दाखल