मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्रीपदापासून अद्यापही दुरच राहिले आहेत. अनेक वेळा कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावले, तशी इच्छाही अनेकदा व्यक्त करून दाखविली, परंतु त्यांना मुख्यमंत्रीपदापासून अद्यापही दुरच राहावं लागलं आहे. यातच अजित पवारांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवाराच मुख्यमंत्री होणार अशी चर्चा होत असतांना भाजप नेत्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा इशारा दिला आहे.
हेही वाचा…गिरीश महाजनांनी धनगर समाजाला ‘तो’ शब्द दिला, अन् २१ दिवस सुरूअसलेलं उपोषण घेतलं मागे
एकनाथ शिंदे महायुतीत सामील होण्याच्या अगोदरच राष्ट्रवादी भाजपसोबत सत्ता स्थापन करणार होती. परंतु शरद पवारांच्या भूमिकेमुळे हा डाव फसला. त्यानंतर अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडत महायुतीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील अन् अजित पवार मुख्यमंत्री बनतील, अशी चर्चा सुरू होती. यातच अजित पवार गटातील नेत्यांकडून देखील या चर्चांना खतपाणी घालण्यात आलं. त्यावर भाजप नेते मोहित कंबोज यांनी एका वाक्यात हा प्रश्न मिटवला आहे.
हेही वाचा…शरद पवारांनी मोदींचा ‘तो’ दावा खोडून काढला, पत्रकारांसमोरच मांडला सगळा इतिहास
भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी याबाबत एक ट्विट केला आहे. त्यात त्यांनी अजित पवार गटाला इशारा दिला आहे. मुख्यमंत्री बनण्यासाठी १४५ आमदार पाहिजेत, फक्त ४५ आमदार असून फायदा नाही. असं मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे. यातच आगामी विधानसभा निवडणुका महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढविणार असल्याचं भाजपनं याआधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अजित पवार गटाचं अजितदादा मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पुर्ण होणार का ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
CM बनने के लिए 145 MLA चाहिए , सिर्फ़ 45 नहीं !
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) September 27, 2023
READ ALSO :
हेही वाचा…भाजपच्या ‘या’ खासदारांचे तिकीट कापणार, फडणवीस-शाह यांची बंद दाराआड चर्चा, नव्या उमेदवारांना संधी
हेही वाचा…पिंपरी-चिंचवडमध्ये ‘आयआयएम’ची शाखा उभारण्याचा संकल्प! महेश लांडगे यांची मागणी, फडणवीसांना दिले निवेदन
हेही वाचा…महायुतीतील लोकसभा निवडणुकीचा पहिला उमेदवार ठरला, ? कॅबिनेट मंत्र्यांनी ‘या’ नेत्याचं नाव केलं जाहीर
हेही वाचा…पक्ष फुटीनंतर शरद पवारांना अजून एक मोठा धक्का, ३० वर्षापासूनची सत्ता गेली, ‘या’ निवडणुकीत मोठा पराभव
हेही वाचा.“भारत मातेच्या घोषणा थांबवून मोदींच्या घोषणा,” बावनकुळेंचा आणखी एक व्हिडीओ चर्चेत