मुंबई : संसदेच्या दोन्ही सभागृहात महिला आरक्षण विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आलं आहे. या विधेयकामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे. यावेळी विरोधकांवर हल्लाबोल करतांना काही पक्षांनी नाईलाजाने महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा दिल्याची टिका मोदींनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्षेप घेतला आहे.
हेही वाचा…डर अच्छा है! “माझ्या ट्विटनंतर अर्ध्या तासातच शिंदेंनी दौरा पुढे ढकलला,” ठाकरेंनी शिंदेंना डिवचलं
देशाचे प्रधानमंत्री यांनी महिलांच्या विधेयकाचा जो निर्णय एकमताने घेतला या निर्णयाच्या संबंधित कोणीही विरोध केलेला नव्हता. जसे SC आणि ST या महिलांना वेगवेगळ्या क्षेत्रात रिक्त जागा आहेत त्याच पद्धतीने OBC यांना देखील समान संधी देण्यात यावी अशा मागणीची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली होती. घटनात्मक दृष्ट्या एकमताने तो निर्णय व्हावा आणि त्याच पद्धतीने त्याचा निकाल लागला. १९९३ साली महाराष्ट्राचे सूत्र माझ्या हातात होते, त्यावेळी महिला आयोग स्थापन करणारे पहिले राज्य हे महाराष्ट्र होते. मी मुख्यमंत्री असताना जून १९९३ मध्ये ‘महिला महाविकास’ हा स्वतंत्र विभाग सुरू केला. असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“खोके देऊन पक्ष फोडा, आता खाली खोके पुन्हा भरण्यासाठी नवीन मार्ग”
दरम्यान, २४ एप्रिल १९९३ रोजी घटना दुरुस्तीच्या अंमलबजावणी नंतर त्रि- स्तरीय पंचायत व्यवस्था लागू झाली. घटनेत ‘२४३ ड’ हे समावेश केले आणि महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण देण्याची तरतूद केली. नगरपालिका, महानगरपालिका, नगरपरिषदा या ठिकाणी घटना दुरुस्तीचा कायदा पास झाला आणि शहरी भागामध्ये महिलांना आरक्षण लागू झाले. २२ जून १९९४ साली महाराष्ट्राने देशात पहिले ‘महिला धोरण’ जाहीर केले. सरकारी, निमसरकारी विभागातील महिलांसाठी ३०% आरक्षण हे रिक्त ठेवण्यात आले. आर्मी, नेव्ही, एअर फोर्स या तिन्ही ठिकाणी ११% जागा महिलांसाठी रिक्त ठेवण्यात याव्यात हा प्रस्ताव मी मुख्यमंत्री असताना मांडला होता. देशाचे प्रधानमंत्री असे बोलतात की, महिलांबद्दल या देशात कधीच कोणीही योग्य निर्णय घेतलेला नाही” हे अमान्य आहे. असंही शरद पवारांनी सांगितलं.
READ ALSO :
हेही वाचा…बॉलिवुडची धक धक गर्ल “माधुरी दिक्षित” ‘या’ पक्षाकडून लोकसभा निवडणुक लढविणार ?
हेही वाचा…“१६ आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी लवकर निर्णय घ्यावा,” पटोलेंची मागणी
हेही वाचा“आमदारांना, मोठी “फाईव्ह स्टार” हॉटेल्स, अन् पत्रकारांना मात्र एक चहा, तोही टपरीवरचा”, राष्ट्रवादीने डिवचलं
हेही वाचा…अजित पवार गटाच्या ‘त्या’ दाव्याची शरद पवार गटाकडून चिरफाड, पुराव्यानिशी आव्हाडांनी बोलती केली बंद
हेही वाचा…“महिला आरक्षणाला कोणाचीही विरोध नाही,” शरद पवारांनी मोदींचा इतिहास बाहेर काढला