मुंबई : संसदेच्या दोन्ही सभागृहात महिला आरक्षण विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आलं आहे. या विधेयकामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे. यावेळी विरोधकांवर हल्लाबोल करतांना काही पक्षांनी नाईलाजाने महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा दिल्याची टिका मोदींनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्षेप घेतला आहे.
हेही वाचा…भाजपचे नेते कोंडी करीत आहेत का ? पत्रकारांच्या प्रश्नांवर पंकजा मुंडेंनी दिलं हसून उत्तर म्हणाल्या.., “
महिला आरक्षण विधेयकाला कोणचाही विरोध नाही. काही पक्षांनी नाईलाजाने विधेयकाला पाठिंबा दिला ही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चुकीची टिका केली आहे. मी मुख्यमंत्री असतांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण दिलं. लष्करात महिलांना संधी द्यावी हा प्रस्ताव मी मांडला. संरक्षण दलातही आम्ही महिलांना संधी दिली. देशात पहिल्यांदा महाराष्ट्रात महिला आरक्षणाचं धोरण आणल्याचं सांगत शरद पवारांनी मोदींवर निशाणा साधला.
हेही वाचा…२ महिन्यांत मराठा पाट्या लावा, कोर्टाचे व्यापाऱ्यांना आदेश, राज ठाकरे म्हणाले, “मूठभर व्यापाऱ्यांनी हा..,”
दरम्यान, याचसोबत कांदा निर्यात शुल्कवाढीमुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहे. त्यामुळे कांद्यावरील ४० टक्के निर्यात शुल्क मागे घ्यावा, अशी विनंती देखील शरद पवार यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…डर अच्छा है! “माझ्या ट्विटनंतर अर्ध्या तासातच शिंदेंनी दौरा पुढे ढकलला,” ठाकरेंनी शिंदेंना डिवचलं
हेही वाचा…“खोके देऊन पक्ष फोडा, आता खाली खोके पुन्हा भरण्यासाठी नवीन मार्ग”
हेही वाचा…हेही वाचा…“खोके देऊन पक्ष फोडा, आता खाली खोके पुन्हा भरण्यासाठी नवीन मार्ग”
हेही वाचा…प्रत्येक जिल्ह्यात भाजपचं माइक्रो प्लानिंग, राजकीय हालचालींना वेग
हेही वाचा…नागपूर शहरही तुंबलं, स्मार्ट सिटीसाठी कोट्यवधी पैशाचं काय झालं ? सेनेचा भाजपला खोचक सवाल