मुंबई : मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राबाबत सखोल चर्चा करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री मुंबईत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली. या बैठकीला अनेक महत्वाचे नेते अनुपस्थित राहिले. महत्त्वाची बाब म्हणजे मराठा आरक्षणासाठी गठीत करण्यात आलेल्या उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचीच बैठकीसाठी उपस्थिती नव्हती. चंद्रकांत पाटील यांच्या अनुपस्थितीमुळे सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमधील मराठा नेत्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला.
हेही वाचा…“मराठा आरक्षण नाही तर शिक्षणही नाही, गावकऱ्यांनी घेतला मोठा निर्णय”
सर्वपक्षीय बैठकीत मंत्रीमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. चंद्रकांत पाटील समितीचे अध्यक्ष असतानाही ते बैठकीला का उपस्थित नाहीत? असा सवाल करत ठाकरे गटातील नेत्यांनी सरकारला प्रश्न विचारला. चंद्रकांत पाटील सकारात्मक नाहीत, त्यामुळे त्यांना बदलावं, अशी मागणी अंबादास दानवे आणि अनिल परब यांनी बैठकीत केली सर्वपक्षीय बैठकीत समितीच्या अध्यक्षपदी चंद्रकात पाटलांऐवजी अजित पवार यांना अध्यक्ष करावं, अशी मागणी देखील यावेळी अनेक नेत्यांकडून करण्यात आली.
हेही वाचा…जी-२० परिषदसाठी भारताने इतर देशापेक्षा केला प्रचंड खर्च, रशियाने फक्त 170 कोटीत आटोपला होता कार्यक्रम
दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत काल सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. यामध्ये जवळपास २३ नेते उपस्थितीत होते. यामध्ये सर्वच पक्षीय नेत्यांना आमंत्रण देण्यात आले होते. यातच मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांना आतापर्यंत १५ पेक्षा अधिक दिवस होऊन गेले आहेत. परंतु यावर कोणताही तोडगा अद्याप निघालेला नाही.
READ ALSO :
हेही वाचा…ठाकरे गटाच्या आमदारांना नोटीस, ठिक १२ वाजता ‘या’ दिवशी होणार सुनावणी
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंचा पुरूषार्थ तर कोविड घोटाळ्यात प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्यात”, चित्रा वाघ यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
हेही वाचा…“महाराष्ट्रातले सगळे सध्या राजकारणी सत्तेला भूकेले, आग लावायची कामं सुरू,” मराठा आरक्षणावरून खोतांची टिका
हेही वाचा…अजित पवार गटातील विधान परिषदेतील ‘या’ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार, शरद पवार गटाकडून हालचाली सुरू
हेही वाचा…मराठा आरक्षणावरून धंगेकरांची फडणवीसांवर जोरदार टिका, म्हणाले, घोषणा केल्या पण…,