नवी दिल्ली : भारतात नवी दिल्ली येथे प्रगती मैदानावर जी-२० परिषद आयोजित करण्यात आली. जगातील प्रमुख नेत्यांची संपुर्ण व्यवस्था भारताने केली होती. जी-२० परिषदेसाठी भारताने मागील एक वर्षापासून तयारी सुरू केली होती. ९ ते १० सप्टेंबर रोजी पार पडलेल्या जी २० परिषदेसाठी भारताने प्रंचड खर्च केला. यावरून काॅंग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे.
काॅंग्रेसच्या लोककल्याणकारी योजनांवर नरेंद्र मोदी नेहमी प्रश्न उपस्थित करतात, त्यासाठी पैसा कुठून येणार ? हा पैशाचा विषय नसून प्राथमिकतेचा आहे. जी २० च्या आयोजनासाठी ४१०० कोटी रूपये खर्च करण्यात आल्याचे काॅंग्रेसने म्हटले आहे. इतर देशात जी २० परिषदेसाठी अगदी कमी खर्च करण्यात आल्याचा संदर्भही काॅंग्रेसने दिला आहे.
हेही वाचा…“ते तुम्ही सिद्ध केलं तर राजकारणातून निवृत्त होईल”, अजित पवारांनी दिलं चॅलेंज
काॅंग्रेसने यासंदर्भात एक ट्विट केला आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, काँग्रेसच्या लोककल्याणकारी योजनांवर मोदीजी नेहमी प्रश्न उपस्थित करतात, त्यासाठी पैसा कुठून येणार? हा पैशाचा विषय नसून प्राथमिकतेचा आहे. G-20 च्या आयोजनासाठी 4100 कोटी रुपये खर्च करण्यात आले. एकट्या भारत मंडपमवर 2700 कोटी रुपये खर्च झाले. आता संपूर्ण G-20 कार्यक्रमावर इतर देशांनी किती खर्च केला ते पहा: जपान – 2669 कोटी रुपये जर्मनी – 642 कोटी रुपये अर्जेंटिना – 931 कोटी रुपये रशिया – 170 कोटी रुपये मोदीजींचा प्रत्येक प्रसंगाला निवडणुकीचा प्रचार कार्यक्रम बनवणे देशाला महागात पडले आहे.
काँग्रेसच्या लोककल्याणकारी योजनांवर मोदीजी नेहमी प्रश्न उपस्थित करतात, त्यासाठी पैसा कुठून येणार? हा पैशाचा विषय नसून प्राथमिकतेचा आहे.
G-20 च्या आयोजनासाठी 4100 कोटी रुपये खर्च करण्यात आले.
एकट्या भारत मंडपमवर 2700 कोटी रुपये खर्च झाले.
आता संपूर्ण G-20 कार्यक्रमावर इतर देशांनी…— Maharashtra Congress (@INCMaharashtra) September 11, 2023
READ ALSO :
हेही वाचा…मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार, आज सर्वपक्षीय ‘या’ २३ नेत्यांची एकत्रित बैठक
हेही वाचा…“किती पापं लपवली, कशामुळे गेलात, हे जनतेपासून लपून राहिलेलं नाही” वडेट्टीवारांचा अजित पवारांना खोचक टोला
हेही वाचा…Breaking News: पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाची स्थगिती उठली! आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश!
हेही वाचा…“मराठा आरक्षण हेच माझ्यावरचे उपचार आहेत, तीच माझी ताकद”
हेही वाचा…“मराठा आरक्षणासाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा”, राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी