मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, यामागणी मागील १४ दिवसापासून मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. यासंदर्भात राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात अनेकदा चर्चा झाल्यात. परंतु त्या असफल ठरल्या, यातच आज सर्वपक्षीय नेत्यांची सांयकाळी बैठक होत आहे. या बैठकीत आता काय चर्चा होणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. परंतु यावरून आता काॅंग्रेसचे कसब्यातील आमदार रविंद्र धंगेकर यांनी राज्य सरकारवर जोरदार टिका केली आहे.
हेही वाचा…“मराठा आरक्षण हेच माझ्यावरचे उपचार आहेत, तीच माझी ताकद”
मागील कित्येक वर्षापासून मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देत आहे. त्या प्रत्येक आंदोलना दरम्यान राज्य सरकारने आरक्षण देण्याचे आश्वासन दिले. तसेच राज्यात आजवर झालेल्या निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर, ओबीसी, मराठा समाजाला आरक्षम देऊ, अशा घोषणा केल्या. पण आजच्या स्थितीला मराठा समाजासह इतर समाजाची आर्थिक स्थिती बिकट आहे. असं रविंद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“मराठा आरक्षणासाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा”, राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
दरम्यान, आम्ही तुम्हाला ४० दिवसांत आरक्षण देऊ, महिन्यात आणि दोन महिन्यात देऊ अशा घोषणा दिल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे. पण निवडणुका झाल्यावर या नेतेमंडळींची बोलण्याची भाषा बदलली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मागील १५ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. आता त्यांची तब्येत खराब आहे. पण आमची त्यांना विनंती आहे की, थोडं थांबून तब्येतीची आणि कुटुंबीयांची काळजी घ्यावी. तसेच आपण आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीत सरकारला जाब विचारू. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे. असंही त्यांनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…“मराठा आरक्षण नाही तर शिक्षणही नाही, गावकऱ्यांनी घेतला मोठा निर्णय”
हेही वाचा…जी-२० परिषदसाठी भारताने इतर देशापेक्षा केला प्रचंड खर्च, रशियाने फक्त 170 कोटीत आटोपला होता कार्यक्रम
हेही वाचा…मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार, आज सर्वपक्षीय ‘या’ २३ नेत्यांची एकत्रित बैठक
हेही वाचा…“किती पापं लपवली, कशामुळे गेलात, हे जनतेपासून लपून राहिलेलं नाही” वडेट्टीवारांचा अजित पवारांना खोचक टोला
हेही वाचा…Breaking News: पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाची स्थगिती उठली! आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश!