मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांची तब्येत बिघडली आहे. डॉक्टरांची एक टीम देखील अंतरवाली सराटे गावात पोहचली आहे. परंतु उपचार घेण्यास मनोज जरांगे पाटलांनी नकार दिला आहे. मराठा आरक्षण हेच माझ्यावरचे उपचार आहेत, तीच माझी ताकद आहे. असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं आहे. यातच आता जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत शाळेत जाणार नाही असा निर्णय एका गावाने घेतला आहे.
हेही वाचा…“मराठा आरक्षणासाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा”, राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
जालना येथील मराठा आरक्षणासाठी बसलेल्या मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा म्हणून वसमत तालुक्यातील अकोली येथे आंदोलन सुरू आहे. येथील गावकऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कुणीही शाळेत जाणार नाही असा निर्णय येथील शालेय विद्यार्थ्यांनी घेतला आहे. गावात पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे. मात्र, एकही विद्यार्थी शाळेत गेला नाही. त्याचबरोबर गावातून बाहेर गावी शिकायला जाणारे विद्यार्थीही गावातच आंदोलनाठिकाणी बसून होते.
दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा केली जाणार आहे. राजकीय पक्षांचं मराठा समाजावर किती प्रेम आहे, ते आता समजेल, ते आता समजेल. असंही जरांगे पाटलांनी म्हटलं आहे. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…जी-२० परिषदसाठी भारताने इतर देशापेक्षा केला प्रचंड खर्च, रशियाने फक्त 170 कोटीत आटोपला होता कार्यक्रम
हेही वाचा…मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार, आज सर्वपक्षीय ‘या’ २३ नेत्यांची एकत्रित बैठक
हेही वाचा…“किती पापं लपवली, कशामुळे गेलात, हे जनतेपासून लपून राहिलेलं नाही” वडेट्टीवारांचा अजित पवारांना खोचक टोला
हेही वाचा…Breaking News: पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाची स्थगिती उठली! आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश!
हेही वाचा…“मराठा आरक्षण हेच माझ्यावरचे उपचार आहेत, तीच माझी ताकद”