नागपुर : मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने नागपूर शहर पाण्याखाली गेले आहे. अवघ्या ४ तासात १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिली आहे. नाग नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी भाजपशासित नागपूर महानगरपालिकेतून तब्बल २, ११७.५४ कोटी रूपये खर्च केल्याचा आरोप राष्ट्रवादी काॅंग्रेसने भाजपवर केला आहे. त्यावर आता शिवसेनेने देखील भाजपवर जोरदार प्रहार केला आहे.
हेही वाचा…शरद पवारांना आता राष्ट्रीय पातळीवरही मोठा धक्का, ‘७’ आमदारांनी शरद पवारांची साथ सोडली
महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर पावसामुळे तुडुंब भरलं, घरांमध्ये पाणी घुसलं. त्यामुळे हजारो नागपूरकरांचे हाल झाले. खरं तर ही समस्या पावसामुळे उद्भवलेली नाही, तर गेली अनेक वर्षे महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या भाजपच्या नियोजनाच्या अभावामुळे घडलेलं आहे. १०० स्मार्ट सिटीमध्ये नागपूर शहरदेखील होतं. स्मार्ट सिटीबाबत चर्चा झाली, त्यावर कोट्यवधी खर्चही झाले. तर मग या पैशाचं काय झालं? पावसाच्या पाण्यात तुंबलेले नागपूर म्हणजेच स्मार्ट सिटी म्हणायचे का? असा सवाल शिवसेनेने भाजपला केला आहे.
हेही वाचा…काळा चहा पिऊन आणि कोल्हापुरी पायताण दाखवत बावनकुळेंच्या वक्तव्याच्या ‘याठिकाणी’ जाहीर निषेध
दरम्यान, नागपुरातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या नाग नदीला पुनर्जीवित करण्यासाठी नवी दिल्लीत जागतिक बॅंक, एनएमसीजी आणि नागपूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी २०२१ साली ग्रीन सिग्रल देण्यात आला होता. त्यानंतर नाग नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी भाजपशासित नागपूर महानगरपालिकेकडून तब्बल २,११७ कोटी रूपये खर्च करण्यात आल्याचं राष्ट्रवादी काॅंग्रेसने म्हटलं आहे.
महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर पावसामुळे तुडुंब भरलं, घरांमध्ये पाणी घुसलं. त्यामुळे हजारो नागपूरकरांचे हाल झाले.
खरं तर ही समस्या पावसामुळे उद्भवलेली नाही, तर गेली अनेक वर्षे महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या भाजपच्या नियोजनाच्या अभावामुळे घडलेलं आहे.
१०० स्मार्ट सिटीमध्ये नागपूर… pic.twitter.com/nWz6rGj4uk
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) September 26, 2023
READ ALSO :
हेही वाचा…भाजपचे नेते कोंडी करीत आहेत का ? पत्रकारांच्या प्रश्नांवर पंकजा मुंडेंनी दिलं हसून उत्तर म्हणाल्या.., “
हेही वाचा…२ महिन्यांत मराठा पाट्या लावा, कोर्टाचे व्यापाऱ्यांना आदेश, राज ठाकरे म्हणाले, “मूठभर व्यापाऱ्यांनी हा..,”
हेही वाचा…आदित्य ठाकरेंचा बोचरा घाव, अन् एकनाथ शिंदेंनी दौराच रद्द केला, पाहा नेमकं काय घडलं ?
हेही वाचा…भाजप आणि शिंदे गटाचा वाद मिटला, ‘ती’ जागा कुणाच्या वाटेला ?
हेही वाचा…बारामतीत भावजय विरूद्ध नणंद सामना होणार ? भाजपने सुप्रिया सुळेंच्या विरोधात मोठा डाव टाकला