ठाणे : अजित पवार महायुतीत सामील झाल्यानंतर भाजपचं आगामी लोकसभेचं गणित थोडं बदललं आहे. यातच आता कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघावरून मागील काही दिवसांपासून शिंदे गट आणि भाजप यांच्यात लढाई सुरू आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातून सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे आहेत. तर ठाण्यातून शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे खासदार आहेत. या दोन्ही जागेंवरून सध्या वाद सुरू आहे.
हेही वाचा…“..त्यामुळेच आजचा निर्णय राखून ठेवला,” शिंदे गटाच्या नेत्यांनी दिली महत्वाची माहिती
कल्याणच्या जागेसाठी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी श्रीकांत शिंदेंच्या विरोधात सुड उठवलं होतं. यावरून बराच वाद झाला होता. यातच आता हा वाद मिटला जाण्याची शक्यता आहे. कल्याणची जागा शिंदे गटाला तर ठाण्याची जागा भाजपला मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत आता या दोन्ही जागेंवर विशेष लक्ष राहणार आहे.
हेही वाचा…नार्वेकरांसमोर ठाकरे अन् शिंदे गटाच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, पुढील सुनावणी ‘या’ तारखेला होणार
दरम्यान, लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांच्या बाबत सर्व निर्णय दिल्लीतील पार्लंमेंट बोर्ड करत असतो. अन् त्या बोर्डाने ठरवलं की एनडीएमधील प्रत्येक उमेदवार निवडून आला पाहिजे. त्यामुळे आमच्या पुढे एकच लक्ष असून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवणं आणि एनडीएमधील ४०० पेक्षा अधिक खासदार निवडून आणणं असं मंत्री रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…बारामतीत भावजय विरूद्ध नणंद सामना होणार ? भाजपने सुप्रिया सुळेंच्या विरोधात मोठा डाव टाकला
हेही वाचा…शरद पवारांना आता राष्ट्रीय पातळीवरही मोठा धक्का, ‘७’ आमदारांनी शरद पवारांची साथ सोडली
हेही वाचा…काळा चहा पिऊन आणि कोल्हापुरी पायताण दाखवत बावनकुळेंच्या वक्तव्याच्या ‘याठिकाणी’ जाहीर निषेध
हेही वाचा…अजितदादांचं अमृता फडणवीसांकडून भरभरून कौतूक, म्हणाल्या, “अजितदादा सोबत असल्यामुळे खूप आनंदी”
हेही वाचा…“शरद पवारांच्या निष्ठेपायी अपात्र झालो, तरी त्याची पर्वा नाही”, पवारांच्या ‘या’ शिलेदारांचं मोठं विधान