पुणे : शिवसेना १६ अपात्र आमदारांबाबत आज विधीमंडळाच्या सभागृहात सुनावणी पार पडली. या सुनावणीच्या वेळी ठाकरे आणि शिंदे गटातील वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. आजच्या सुनावणीत पुढील सुनावणी कशी घेणार आहात? वेळापत्रक कसं असेल ? किती वेळ लागेल.? असे अनेक प्रश्न ठाकरे गटाच्या वकिलांनी केलेत. यातच ठाकरे गटाच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादावर शिंदे गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतले आहे. तर पुढील सुनावणी आता १३ ऑक्टोंबरला होणार आहे. यावर आता शिंदे गटातील नेते संजय शिरसाठ यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…करो या मरो…, शिवसेना १६ अपात्र आमदारांबाबत नार्वेकरांना निर्णय घ्यावाच लागणार ? निकालाकडे सगळ्याचं लक्ष
दोन बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नियमानुसार आपण शेड्युल ठरवून घेऊ, असं म्हणत विधानसभा अध्यक्षांनी आजचा निकाल राखून ठेवला आहे. यातच लाईव्ह सुनावणीवरून विधानसभा अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली. तसेच दोन्ही बांजूच्या वकिलांचं एकमत घेऊन हा निर्णय राखून ठेऊ, आणि पुढच्या सुनावणीत शेड्युल नुसार सुनावणी घेऊ, असं राहुल नार्वेकरांनी सांगितलं असल्याचं संजय शिरसाठ यांनी म्हटलं.
हेही वाचा…“‘चल बाबा तुझ्याही घरी येतो’, ” फडणवीसांच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर भाजपचं स्पष्टीकरण
दरम्यान, आजची सुनावणी संपली असून पुढची सुनावणी आता १३ ऑक्टोबरला होणार आहे. आजच्या सुनावणी दोन्ही बाजूकडून युक्तिवाद झाले असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्षांकडून सुनावणीच्या संदर्भात वेळापत्रक जाहीर केले जाईल. पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला होणार आहे. तर, उद्धव ठाकरे गटाकडून सर्व याचिका एकत्र करण्यासाठी आणि एकच सुनावणी घेण्यासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर शिंदे गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतला. प्रत्येक याचिकांवर वैयक्तिकरित्या सुनावणी व्हावी आणि प्रत्येक याचिकांबाबत पुरावे दिले जातील, अशी बातमी एएनआयने दिलीय.
READ ALSO :
हेही वाचा…नार्वेकरांसमोर ठाकरे अन् शिंदे गटाच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, पुढील सुनावणी ‘या’ तारखेला होणार
हेही वाचा…अजित पवार गटाकडून शरद पवार गटातील ‘या’ बड्या नेत्याला ऑफर, ऑफर नाकारत म्हणाले, “मी शरद पवारांचा पक्का शिलेदार”
हेही वाचा…“तर राज्यातील लोकसभेच्या ४८ जागा लढवू,” वंचितने ‘कुणाला’ दिला इशारा ? युतीची शक्यता धुसूर
हेही वाचा…“आता कोणाला कितीही धाब्यावर नेलं, तरी २०२४ मध्ये जनता भाजपला घरी बसवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही”
हेही वाचा…29 तारखेला ‘कोणत्या’ तीन घोषणा होणार ? शरद सोनवणे यांच्या घोषणांकडे नागरिकांच्या नजरा