मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय नेत्यांनी आपापली रननीति ठरवली जात आहे. यातच इंडिया आघाडीत येण्यासाठी वंचित आग्रही असून याबाबत इंडिया आघाडीतील नेत्यांनी याबाबत कोणतंही भाष्य केलं नाही. यातच वंचितसोबत शिवसेना ठाकरे गटाची युतीची घोषणा केली आहे. परंतु वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे.
हेही वाचा…“कपटनीतीत गुंतलेले गृहमंत्र्यांचे लक्ष, २ पक्ष फोडण्यात,” ‘त्या’ व्हिडीओवरून राष्ट्रवादीचा हल्लाबोल
आगामी लोकसभेच्या जागावाटपावर आणि शिवसेना ठाकरे बरोबरच्या युतीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. आमची निवडणुकीसंदर्भात काय भूमिका आहे? त्याचा संदेश आम्ही शिवसेनेपर्यंत पोहोचवला आहे. मविआतल्या जागावाटपातील जागा निश्चित झाल्या तर मग शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीतल्या जागावाटपाचा भाग सुरू होईल. सगळ्याच शक्यता लक्षात घेत आणि अगदी वाईटात वाईट शक्यताही लक्षात घेत, जर कोणाचीच कोणाशी युती होणार नाही असं गृहित धरून आम्ही राज्यातील ४८ जागांच्या तयारीला लागलो आहोत.
हेही वाचा…“५० कोटींचं आमीष दाखवून राष्ट्रवादीत बंडखोरी, पुढच्या वर्षी आणखी ५० कोटी,” विरोधी पक्षनेत्याचा मोठा दावा
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांनी इंडिया आघाडी स्थापन केली आहे. यातच राज्यात महाविकास आघाडीत सध्या काॅंग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचा शरद पवार गट आहे. यातच वंचितसोबत ठाकरे गटाची युती झाली आहे. परंतु महाविकास आघाडीत त्यांना अद्यापही घेतलं नाही. यावर आता आंबेडकरांनी एक प्रकारे इशाराच दिला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“आता कोणाला कितीही धाब्यावर नेलं, तरी २०२४ मध्ये जनता भाजपला घरी बसवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही”
हेही वाचा…29 तारखेला ‘कोणत्या’ तीन घोषणा होणार ? शरद सोनवणे यांच्या घोषणांकडे नागरिकांच्या नजरा
हेही वाचा…करो या मरो…, शिवसेना १६ अपात्र आमदारांबाबत नार्वेकरांना निर्णय घ्यावाच लागणार ? निकालाकडे सगळ्याचं लक्ष
हेही वाचा…“‘चल बाबा तुझ्याही घरी येतो’, ” फडणवीसांच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर भाजपचं स्पष्टीकरण
हेही वाचा…“पत्रकारांना चहा पाजा, धाब्यावर न्या,” बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर खळबळ, विरोधी पक्षांचा भाजपवर हल्लाबोल