पुणे : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील आमदारांना अजित पवार गटाकडून ब्लॅकमेलिंग सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यावरून आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होतांना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याप्रकरणावरून भाजपवर हल्लाबोल चढवला आहे.
हेही वाचा…अमित शहांच्या स्वागतासाठी मंत्र्यांची रांग, वडेट्टीवारांची राज्य सरकारवर जोरदार टिका, म्हणाले..हुजरेगिरी
आमदारांना ५० कोटींचं प्रलोभन दाखवून राष्ट्रवादीत बंडखोरी झाल्याचा माझा आरोप आहे. यावर्षी ५० कोटी आणि पुढच्या वर्षी ५० कोटी अशा प्रकराचं आमदारांना प्रलोभन दाखवण्यात आलं आहे. तसेच, ज्या पद्धतीने गोपीचंद पडळकर अजित पवारांवर टिका करत आहेत, अशा प्रकारे खालच्या पातळीवर जाऊन टिका कुणीही करू नये. व्यक्तिगत टिका करणे चुकीचे आहे. परंतू, एका आमदारामुळं राज्याच्या अध्यक्षाला माफी मागावी लागते हे पक्षाचे दुर्दैव आहे. असंही विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“राज्यात पुन्हा भाजपचं सरकार येऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील,” भाजप आमदाराचा मोठा दावा
दरम्यान, अजित पवार गटाकडून शरद पवार गटातील आमदार, खासदारांना विकास निधींवरून ब्लॅकमेलिंग सुरू असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता. त्यावर आता रोहित पवारांना अजित पवार गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. छगन भुजबळ यांच्याबरोबर आमदार सुनील शेळके यांनी देखील रोहित पवारांनी अगोदर भाजपसोबत जाण्याच्या निर्णयासाठी शरद पवारांची भेट घेतल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता रोहित पवार विरूद्ध अजित पवार गट असा सामना सध्या सुरू आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मनात, पोटात आणि ओठात काय ? हे शरद पवारांनाच माहिती”, गौतम अदाणी भेटीवर भाजप नेत्याची प्रतिक्रिया
हेही वाचा…नाग नदीवर तब्बल २,११७ कोटी रूपये खर्च, तर पुर आलाच नसता, भाजपचा भोंगळ कारभार, राष्ट्रवादीची टिका
हेही वाचा…सागर बंगल्यावर खलबतं, दिल्लीला जाता जाता अमित शाह महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय घेणार
हेही वाचा…“जिल्हा परिषद शाळा बंद करण्याच्या मनुवादी भाजपच्या हालचाली”, नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल
हेही वाचा…मुसळधार पावसाने नागपूर शहर पाण्याखाली, फडणवीस सांयकाळी नागपूरात जाणार