मुंबई : एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर अजित पवारांनी देखील राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारत महायुतीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यातच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, अशी आशा बाळगतांना भाजपने शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ टाकली. यामुळे भाजप नेते नाराज झालेत. यातच आता पुढच्या वेळी कोण मुख्यमंत्री होणार. याबाबत भाजप आमदाराने मोठं विधान केलं आहे.
हेही वाचा…इंडिया आघाडीत वाद वाढणार, शरद पवार गौतम अडाणींच्या भेटीला
भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केलं आहे. निश्चितपणे यात काही शंका नाही. बाप्पाने निश्चितचं केलं आहे. २०२४ नाही, तर २०३४ पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार या देशात राहील. राज्यात भाजपच्या नेतृत्वात पुन्हा एकदा सरकार स्थापन होईल आणि देवेंद्र फडणवीस आमचे मुख्यमंत्री होतील. असं वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलंय.
हेही वाचा…सुप्रिया सुळे भाजपविरोधात आक्रमक, भाजपच्या ‘या’ खासदाराच्या विरोधात हक्कभंगाचा दाखल केला प्रस्ताव
दरम्यान, प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं हे. प्रसाद लाड हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यांनी त्यांच्या नेत्याचं नाव घेणं काही गैर नाही. आम्हालाही वाटतं की, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. अजित पवार यांच्या गटाला वाटतं की, अजित पवार मुख्यमंत्री होतील.
READ ALSO :
हेही वाचा…काॅंग्रेसच्या ‘या’ माजी मंत्र्यांच्या मुलाने महिलेस दिली ठा’र मारण्याची धमकी, 16 जणांवर गुन्हा दाखल
हेही वाचा…रोहित पवारांविरोधात अजित पवार गट आक्रमक, ‘त्या’ आरोपांवर अजित पवार गटाचं जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…“नफ़रत के बाजा़र में मोहब्बत की दुकान”, राहुल गांधींनी घेतली दानिश अलींची भेट
हेही वाचा…“संजय राऊत महामूर्ख, राऊतांना गाढवावर बसून फिरवायला पाहिजे”, अपक्ष आमदाराचा राऊतांवर हल्लाबोल
हेही वाचा…“ते विधान अजित पवारांसाठी नव्हतं तर ‘या’ नेत्यासाठी होतं”, सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्टीकरण