मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असून त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध लालबाग गणपती दर्शन घेतलं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर जाऊन तेथील गणपती दर्शन घेऊन ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गेले आहेत. सागर बंगल्यावर अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड जवळपास एक तासाहूंन अधिक चर्चा सुरू आहे.
हेही वाचा…रोहित पवारांविरोधात अजित पवार गट आक्रमक, ‘त्या’ आरोपांवर अजित पवार गटाचं जोरदार प्रत्युत्तर
या बैठकीत राज्यातील सध्याच्या घडामोडींवर चर्चा झाल्याची शक्यता आहे. राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाज, धनगर समाज आक्रमक झालाय. तसेच ओबीसी समाजही आक्रमक झालाय. याशिवाय राज्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदार अपात्र प्रकरणी एका आठवड्यात सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे घडामोडी वेगाने घडत आहेत. नार्वेकर नुकतंच दिल्लीला जावून कायदेतज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन आले. त्यानंतर आता अमित शाह मुंबई दौऱ्यावर आले आहेत.
हेही वाचा…“नफ़रत के बाजा़र में मोहब्बत की दुकान”, राहुल गांधींनी घेतली दानिश अलींची भेट
अमित शाह यांनी सागर बंगल्यावर गणपतीचं दर्शन घेतलं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्यात बैठक सुरू झाली आहे. मागील काही दिवसापासून राज्यात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण, शिवसेना अपात्र प्रकरण सुरू आहे. या प्रकरणाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही चर्चा केली जाणार का ? अशी चर्चा देखील रंगली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“जिल्हा परिषद शाळा बंद करण्याच्या मनुवादी भाजपच्या हालचाली”, नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल
हेही वाचा…मुसळधार पावसाने नागपूर शहर पाण्याखाली, फडणवीस सांयकाळी नागपूरात जाणार
हेही वाचा…अमित शहांच्या स्वागतासाठी मंत्र्यांची रांग, वडेट्टीवारांची राज्य सरकारवर जोरदार टिका, म्हणाले..हुजरेगिरी
हेही वाचा…“राज्यात पुन्हा भाजपचं सरकार येऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील,” भाजप आमदाराचा मोठा दावा
हेही वाचा…काॅंग्रेसच्या ‘या’ माजी मंत्र्यांच्या मुलाने महिलेस दिली ठा’र मारण्याची धमकी, 16 जणांवर गुन्हा दाखल