अहमदनगर : भाजपच्या वतीने अहमदनगरच्या सावेडी येथे पदाधिकारी आणि बूथ कार्यकर्त्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकूळे यांनी पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीसंदर्भात विशेष सल्ला दिला आहे. पत्रकारांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात बातम्या छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला न्या. पत्रकारांना चहा प्यायला न्यायचं म्हणजे काय ते तुम्हाला समजलंच असेल. तसेच पत्रकारांना ढाब्यावर जेवायला घेऊन जा. असं विधान बावनकुळेंनी केलं आहे. त्यावरून आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…“जिल्हा परिषद शाळा बंद करण्याच्या मनुवादी भाजपच्या हालचाली”, नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल
चंद्रशेखर बावनकुळे तुम्ही राज्यातील पत्रकारांना काय चिरीमिरी घेणारे समजताय का ? देशातील १२ पत्रकार विकले गेले म्हणून सगळे पत्रकार स्वत: चा इमान विकतील असं नाही. दुसऱ्यांचे पक्ष फोडून, इडी सीबीआय सारख्या संस्थांचा धाक दाखवून ही भाजप विरूद्ध आवाज दाबत नाही आहे. त्यामुळे दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत तुमच्या पक्षातील सर्व नेत्यांच आणि अंधभक्तांची वाढलेली अस्वस्थता आम्ही समजू शकतो. पण त्यामुळे तुम्ही थेट पत्रकारांना चिरीमिरी द्यायला निघाले? असा सवाल देखील वडेट्टीवारांनी भाजपला केला आहे.
हेही वाचा…मुसळधार पावसाने नागपूर शहर पाण्याखाली, फडणवीस सांयकाळी नागपूरात जाणार
दरम्यान, भाजपची सध्याची अवस्था पाहून आगामी निवडणुकीत भाजप मतांसाठी जनतेला सुद्धा चिरीमीरी द्यायचा प्रयत्न करणार हे नक्की आहे. परंतु जनता २०२४ मध्ये भाजपची चिंधी उधळल्याशिवाय राहणार नाही. असा इशाराही विजय वडेट्टीवारांनी दिला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“कपटनीतीत गुंतलेले गृहमंत्र्यांचे लक्ष, २ पक्ष फोडण्यात,” ‘त्या’ व्हिडीओवरून राष्ट्रवादीचा हल्लाबोल
हेही वाचा…“५० कोटींचं आमीष दाखवून राष्ट्रवादीत बंडखोरी, पुढच्या वर्षी आणखी ५० कोटी,” विरोधी पक्षनेत्याचा मोठा दावा
हेही वाचा…“मनात, पोटात आणि ओठात काय ? हे शरद पवारांनाच माहिती”, गौतम अदाणी भेटीवर भाजप नेत्याची प्रतिक्रिया
हेही वाचा…नाग नदीवर तब्बल २,११७ कोटी रूपये खर्च, तर पुर आलाच नसता, भाजपचा भोंगळ कारभार, राष्ट्रवादीची टिका
हेही वाचा…सागर बंगल्यावर खलबतं, दिल्लीला जाता जाता अमित शाह महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय घेणार