मुंबई : नागालँड मधील सदस्यांना एनडीएचे घटक पक्ष होण्यासाठी शरद पवार यांनी परवानगी दिली होती. त्याचवेळी आम्ही एनडीए चे घटक झालो होतो असा दावा काल अजित पवार गटाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. नागालँड मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ७ आमदारांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावर अजित पवार गटाने केलेला दावा शरद पवार गटाने फोल ठरवला आहे. आज पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुराव्यानिशी दाव्याची चिरफाड केली.
हेही वाचा…नागपूर शहरही तुंबलं, स्मार्ट सिटीसाठी कोट्यवधी पैशाचं काय झालं ? सेनेचा भाजपला खोचक सवाल
नागालँडमध्ये सरकार स्थापन होत असतांना नागालँडच्या विकासासाठी त्यांनी सरकार मध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी त्यांच्या इच्छेनुसार आम्ही नागालँडच्या सर्वांगिण विकासासाठी अस्तित्वात असलेल्या मंत्रिमंडळात सहभागी व्हावं ,यासाठी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आम्ही एनडीए मध्ये सहभागी झालो नाही. याचा पुरावा देखील आमच्याकडे आहे.
हेही वाचा…भाजपचे नेते कोंडी करीत आहेत का ? पत्रकारांच्या प्रश्नांवर पंकजा मुंडेंनी दिलं हसून उत्तर म्हणाल्या.., “
दरम्यान, नागालॅंडच्या सर्व सदस्यांनी ३० जुन रोजी समर्थन दिलं होतं. तर मग १ जुलै रोजी तुम्हाला नागालॅंडच्या सदस्यांनी प्रतिज्ञापत्र का दिलं नाही. २१ ऑगस्ट रोजी प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं होतं. परंतु त्याच्या आधीच आम्ही १८ ऑगस्ट रोजी सदस्यांवर अपात्रतेची याचिका दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाचा नियम आहे की, त्यांच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहतो. असंही जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“महिला आरक्षणाला कोणाचीही विरोध नाही,” शरद पवारांनी मोदींचा इतिहास बाहेर काढला
हेही वाचा…डर अच्छा है! “माझ्या ट्विटनंतर अर्ध्या तासातच शिंदेंनी दौरा पुढे ढकलला,” ठाकरेंनी शिंदेंना डिवचलं
हेही वाचा…“खोके देऊन पक्ष फोडा, आता खाली खोके पुन्हा भरण्यासाठी नवीन मार्ग”
हेही वाचा…हेही वाचा…“खोके देऊन पक्ष फोडा, आता खाली खोके पुन्हा भरण्यासाठी नवीन मार्ग”
हेही वाचा…प्रत्येक जिल्ह्यात भाजपचं माइक्रो प्लानिंग, राजकीय हालचालींना वेग