मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने मेगा प्लॅन तयार केला आहे. यातच राज्यातील लोकसभेच्या ४८ जागापैंकी किमान ४५ जागा तरी जिंकल्या पाहिजे, असे आदेशच वरिष्ठांनी राज्यातील भाजप नेत्यांना दिले आहेत. यासाठी भाजपने राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षाला भाजपने फोडले असल्याचा आरोप विरोधकांकडून केला गेला. यातच आता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजप अनेक दिग्गजकांना उतरवणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…“खोके देऊन पक्ष फोडा, आता खाली खोके पुन्हा भरण्यासाठी नवीन मार्ग”
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अलिकडेच मुंबई दौरा केला. यावेळी त्यांनी मुंबईच्या प्रसिद्ध लालबाग राजाचं दर्शन घेतलं. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर अमित शाह यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा केली. यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात कुणाला संधी द्यायला हवी, याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा..“खोके देऊन पक्ष फोडा, आता खाली खोके पुन्हा भरण्यासाठी नवीन मार्ग”
आगामी लोकसभा निवडणुकीत प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दिक्षितला उत्तर मुंबईमधून तिकीट देणार असल्याची चर्चा आहे. मागच्या निवडणुकीत काॅंग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांना पराभव करत भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी विजयी झाले होते. तर दुसऱ्या बाजूला जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी प्रसिद्ध वकिल उज्जल निकम यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. सध्या या जागेवर भाजपचेच खासदार उन्मेष पाटील खासदार आहेत.
हेही वाचा…प्रत्येक जिल्ह्यात भाजपचं माइक्रो प्लानिंग, राजकीय हालचालींना वेग
नाशिक परिक्षेत्राचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक व राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य. डॉ. प्रताप दिघावकर यांच्या नावाची चर्चा धुळे लोकसभा मतदारसंघासाठी केली जात आहे. सध्या याठिकाणी भाजपचे खासदार सुभाष भामरे खासदार आहेत. तर दुसरीकडे पुणे लोकसभेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक व भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सत्ता स्थापन केली. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा धाक निर्माण झाला आहे. विरोधकांनी मोदींच्या विरोधात इंडिया आघाडी स्थापन केल्यानंतर भाजपला याची मोठी धास्ती निर्माण झाली आहे. यातच आता राज्यात प्रत्येक नेत्यांना विशेष जबाबदारी सोपवली असून कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रातून ४५ जागा लोकसभेत निवडणून आल्या पाहिजेत. असे आदेशच वरिष्ठांनी भाजपच्या नेत्यांना दिले आहेत. त्यामुळे आता लोकसभेच्या जागांसाठी विविध नेत्यांच्या नावांची चाचपाणी सुरू झाली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“१६ आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी लवकर निर्णय घ्यावा,” पटोलेंची मागणी
हेही वाचा“आमदारांना, मोठी “फाईव्ह स्टार” हॉटेल्स, अन् पत्रकारांना मात्र एक चहा, तोही टपरीवरचा”, राष्ट्रवादीने डिवचलं
हेही वाचा…अजित पवार गटाच्या ‘त्या’ दाव्याची शरद पवार गटाकडून चिरफाड, पुराव्यानिशी आव्हाडांनी बोलती केली बंद
हेही वाचा…“महिला आरक्षणाला कोणाचीही विरोध नाही,” शरद पवारांनी मोदींचा इतिहास बाहेर काढला
हेही वाचा…डर अच्छा है! “माझ्या ट्विटनंतर अर्ध्या तासातच शिंदेंनी दौरा पुढे ढकलला,” ठाकरेंनी शिंदेंना डिवचलं