अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे आक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेलं धनगर समाजाचं उपोषण अखेर २१ व्या दिवशी मागे घेण्यात आलं आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वातील शिष्ठमंडळाची मध्यस्थी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्यानंतर यशवंत सेनेचे सुरेश बंडगर आणि अण्णासाहेब रूपनवर यांनी हा उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा…“महिला आरक्षणाला कोणाचीही विरोध नाही,” शरद पवारांनी मोदींचा इतिहास बाहेर काढला
२१ सप्टेंबरला धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार आणि सर्व धनगर समाजाचे प्रतिनिधी यांची मुंबईत बैठक झाली. राज्या सरकारने त्यांच्या मागणीला न्याय म्हणत एकमताने पाठिंबा दिला. या आरक्षणासाठी काही तांत्रिक अडचणी आहेत. काही गोष्टी न्याय प्रविष्ट आहेत. त्या गोष्टी सोडवण्यासाठी शासन अतिशय गंभीर आणि कटिबद्ध आहे. असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…डर अच्छा है! “माझ्या ट्विटनंतर अर्ध्या तासातच शिंदेंनी दौरा पुढे ढकलला,” ठाकरेंनी शिंदेंना डिवचलं
दरम्यान, आवश्यकात भासल्यास धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एका आयोगाची नेमणूक करण्यात येईल. यासाठी शासन आपली पुढील कार्यवाही करेल. या तांत्रिक गोष्टी पुढील ५० दिवसात पार पाडल्या जातील. आधीच्या बैठकीत दोन महिने सांगितले होते. मात्र उपोषण कर्त्यांचं म्हणणं आहे की, त्या बैठकीला ८ दिवस होऊन गेलेत. त्यापुढे पुढील ५० दिवसांमध्येही कार्यवाही पूर्ण करावी. जेमेकरून या आरक्षणातील अडचणी दूर होतील असंही गिरीश महाजन यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवारांनी मोदींचा ‘तो’ दावा खोडून काढला, पत्रकारांसमोरच मांडला सगळा इतिहास
हेही वाचा…बॉलिवुडची धक धक गर्ल “माधुरी दिक्षित” ‘या’ पक्षाकडून लोकसभा निवडणुक लढविणार ?
हेही वाचा…“१६ आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी लवकर निर्णय घ्यावा,” पटोलेंची मागणी
हेही वाचा“आमदारांना, मोठी “फाईव्ह स्टार” हॉटेल्स, अन् पत्रकारांना मात्र एक चहा, तोही टपरीवरचा”, राष्ट्रवादीने डिवचलं
हेही वाचा…अजित पवार गटाच्या ‘त्या’ दाव्याची शरद पवार गटाकडून चिरफाड, पुराव्यानिशी आव्हाडांनी बोलती केली बंद