मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपावरून सध्या महायुतीत जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहे. कल्याण लोकसभा आणि ठाणे लोकसभा मतदारसंघावरून गेल्या काही महिन्यापासून भाजप आणि शिंदे गटात मोठा संघर्ष बघायला मिळत आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळावा, अशी स्थानिक पदाधिकऱ्यांची मागणी आहे. तर कल्याण लोकसभा मतदारसंघ शिंदे गटालाच मिळणार असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. यातच आता ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे.
हेही वाचा…“१६ आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी लवकर निर्णय घ्यावा,” पटोलेंची मागणी
कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेच निवडणूक लढवतील तर ठाणे लोकसभेसह राज्यातील इतर मतदार संघातून महायुतीतील कोणता पक्ष निवडणुक लढणार याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेणार आहेत.अशी माहिती शंभुराज देसाई यांनी दिली आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती २०० पेक्षा जास्त जागा जिंकेल असा दावाही त्यांनी केला आहे.
हेही वाचा..“आमदारांना, मोठी “फाईव्ह स्टार” हॉटेल्स, अन् पत्रकारांना मात्र एक चहा, तोही टपरीवरचा”, राष्ट्रवादीने डिवचलं
दरम्यान, कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दावा सांगितला आहे. अलिकडेच या जागेवरून श्रीकांत शिंदे आणि भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील संघर्षात वाढ झाली होती. हा वाद इतका चिघळला होता की श्रीकांत शिंदे आपल्या खासदारकीचा राजीनामा देण्यास तयार झाले होते. त्यानंतर भाजपच्या वरिष्ठांशी चर्चा करून हा वाद तात्पुरता सोडवण्यास आला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…पक्ष फुटीनंतर शरद पवारांना अजून एक मोठा धक्का, ३० वर्षापासूनची सत्ता गेली, ‘या’ निवडणुकीत मोठा पराभव
हेही वाचा.“भारत मातेच्या घोषणा थांबवून मोदींच्या घोषणा,” बावनकुळेंचा आणखी एक व्हिडीओ चर्चेत
हेही वाचा…गिरीश महाजनांनी धनगर समाजाला ‘तो’ शब्द दिला, अन् २१ दिवस सुरूअसलेलं उपोषण घेतलं मागे
हेही वाचा…शरद पवारांनी मोदींचा ‘तो’ दावा खोडून काढला, पत्रकारांसमोरच मांडला सगळा इतिहास
हेही वाचा…बॉलिवुडची धक धक गर्ल “माधुरी दिक्षित” ‘या’ पक्षाकडून लोकसभा निवडणुक लढविणार ?