मुंबई: आगामी काळातील मुंबई आणि पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढचा गियर टाकला आहे. दिग्ग्ज आणि वजनदार मंत्र्यांचे मुंबई, पुण्यात दौरे वाढले आहेत. काल सकाळी मुंबईमधील वरळी विधानसभा मतदारसंघात म्हणजेच आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विविध विकासकामांची पाहणी केली होती.
मोठी बातमी: राज्यातील १० महापालिकेच्या निवडणूका पुढे जाणार? मार्च-एप्रिल ऐवजी जुन-जुलैमध्ये?
यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी अजित पवारांचे स्वारथ्य केले होते. या दौऱ्यावरून भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि नेते आशिष शेलार यांनी ठाकरे-पवारांवर टीका केली आहे. ठाकरे-पवारांनी केलेल्या या दौऱ्यात राजकीय सफारी सोडून काहीच नव्हते. मुंबई जर खरी बघायची असेल तर ४३७स्केवर किलोमीटर फिरावे लागेल. वरळीचा ब्रिज म्हणजे पूर्ण मुंबई नाही हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं. शिवसेनेच्यादृष्टीने मुंबई वरळीचा ब्रीज आणि कलानगरचे जंक्शन यापलिकडे नाही.
किरीट सोमय्यांवर सूड उगवला गेलाय, आम्ही सहजासहजी घेणार नाही – चंद्रकांत पाटील
ज्यापध्दतीने मुंबईमध्ये वरळीच्या मतदारसंघात ब्रीजखाली दिवे लावले, त्याचपध्दतीने मानखुर्द, धारावीमधल्या गल्ल्यांमध्ये सौरदिवेसुध्दा तुम्ही लावले नाहीत. मागच्या टॅगलाईनमध्ये म्हटले होते की ‘करून दाखवलं’, जर करून दाखवलं तर आता पुढे चला म्हणण्याची गरज काय?. ज्यांना मागची पापं लपवायची आहेत, ते लोकांना भ्रमिष्ट करत आहेत. त्यामुळे पहिला हिशेब द्या, हा आमचा नारा असल्याचे शेलार यांनी सांगितले.सफारी कुठली करताय? असा संतप्त सवाल देखील आशिष शेलार यांनी केला आहे.
Read also:
- ठाकरे-पवारांचा मुंबईत सकाळी सकाळी वजनदार दौरा; मिशन मुंबईची जोरदार तयारी
- गोव्यात काँग्रेस नेते फक्त पर्यटनासाठीच यायचे – मोदी
- नुसती उचलली जीभ लावली टाळ्याला असं करू नका; अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला
- ज्या दिवशी बोलेन त्या दिवशी अनेक लोकांचा बीपी वाढेल; नितेश राणेंचा हल्लाबोल
- हिंगणघाट जळीतकांड प्रकरण: तरुणीला जिवंत जाळणाऱ्या नराधमाला अखेर जन्मठेपेची शिक्षा